शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांच्या अंगणात पाणी येत नाही, त्याकडे कधी लक्ष देणार?

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2020 00:40 IST

उन्हाचा कडाका जाणवू लागला असून, अनेकांच्या अंगणात पिण्याचे पाणीही येईनासे झाले आहे; शिवाय ही वेळ कोरोनाच्या संकटाशी एकदिलाने लढण्याची आहे. पण त्याकडे लक्ष पुरविण्याऐवजी भाजपने कोरोनाकाळात अंगणात उतरून राज्य सरकार विरोधात आंदोलन केले; त्यामुळे अशांच्या कळकळीमागील राजकारण लक्षात यावे.

ठळक मुद्देकोरोनाबाबत राज्य सरकारवर टीका करणारे विरोधक स्थानिक प्रश्नांवर मात्र क्वॉरण्टाइन ! कोरोनाच्या संकटामुळे गेले दोन महिने सर्व आघाड्यांवर हबकलेपण आले आहे.

सारांश।कोरोनाला अटकाव घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत, अंगणात अवतरलेले भाजपचे पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी जनतेला अन्य समस्यांनाही सामोरे जावे लागत असताना घरात दडून का होते, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विशेषत: उन्हाचा चटका असह्य होऊन पाणीटंचाई जाणवू लागली असताना त्याबाबत कुणी तोंड उघडायला तयार नाही, मात्र कोरोनावरून राज्यातील सरकारवर नाकर्तेपणाचा शिक्का उमटवायला अनेकजण सरसावले, त्यामुळे कोरोनाच्या रणांगणातील राजकारण उघड झाल्याखेरीज राहू नये.

कोरोनाच्या संकटामुळे गेले दोन महिने सर्व आघाड्यांवर हबकलेपण आले आहे. जिवाच्या आकांतापुढे अन्य अपेक्षा वा अडचणींना तितकासा अर्थ उरला नाही; पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता यावे असेही नाही. उन्हाळा तीव्र होऊ लागला असून, पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागत असल्याने ठिकठिकाणी त्यासंबंधीची ओरड पुढे येऊ लागली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे पाण्यासाठीची तगमग, अशा दुहेरी पातळीवर जनता हवालदिल झालेली दिसत आहे. बरे, केवळ ग्रामीण भागातच पाण्याचे संकट आहे अशातला भाग नाही; नाशिक महानगरातील टिळकवाडी या मध्यवस्तीमधील माता-भगिनींवरही पाण्यासाठी हंडे-गुंडे घेऊन आपल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर बसण्याची वेळ ओढवलेली पहावयास मिळाले; पण याबाबत काही बोलायचे अगर समस्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करायचे सोडून भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कोरोनासंबंधी राज्य सरकार अपयशी ठरल्याची हाकाटी पिटत घराबाहेर पडलेले पहावयास मिळाले, त्यामुळे या आंदोलनामागील त्यांच्या कळकळीबद्दल शंकाच घेतली जाणे गैर ठरू नये.

‘अंगण हेच रणांगण’ असे सूत्र घेऊन भाजपने राज्यभर ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन छेडले, त्यानिमित्ताने कोरोनाकाळात बेपत्ता राहिलेले या पक्षाचे अनेक ‘सेवक’ अंगणात दिसून आले, तर कुणी अंगण सोडून शाळेच्या पटांगणावर झोपडपट्टीवासीय चिल्ल्यापिल्ल्यांना भरउन्हात एकत्र करून आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय कोडगेपणा प्रदर्शित करताना दिसून आले. पक्षीय अजेंड्यानुसार त्यांनी पक्षधर्म निभावला हे ठीक; पण अनेकांच्या अंगणात पिण्याचे पाणी पोहोचत नसताना, आणि कोरोनामुळेच रोजगार बुडाल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूर आदी लोकांच्या उदरनिर्वाहाचे हाल होत असताना हे आंदोलनकर्ते कुठे लपून बसले होते? अपवाद वगळता सारे राजकारणी आजवर ‘क्वॉरण्टाइन’ होते. कुणी फार्म हाउसवर ‘लॉकडाउन’ होते तर कुणी घरातच, त्यामुळे कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा फलक हाती घेऊन अंगणात उभ्या दिसलेल्यांच्या सक्रियतेमागील राजकीय हेतू उघड झाल्याखेरीज राहू नये. अर्थात, ही वेळ राजकारणाची अगर आंदोलनाची नाही तर एकोप्याने कोरोनाशी लढायची आहे, असा योग्य विचार करून भाजपचेच दिनकर पाटील यांच्यासारखे नेते या ‘अवकाळी’ आंदोलनापासून दूर राहिले हेच खूप बोलके आहे. पाटील यांनी यासंदर्भात दर्शविलेला सुज्ञपणा म्हणजे, भाजपला मिळालेला ‘घरच्याच अंगणातील आहेर’ म्हणता यावा.

महत्त्वाचे म्हणजे, नाशिक महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. कोरोनामुळे शहरातील अनेक कामे खोळंबिली आहेत. आता तर पावसाळा तोंडावर असल्याने नाला-सफाईपासून अनेक कामांकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. पण घोषित केलेली महासभा सत्ताधाऱ्यांना गुंडाळून ठेवावी लागली. मुंबई-पुण्यात कोरोनाचे रुग्ण कितीतरी अधिक असताना तेथे महापालिकांचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील स्थायीसह अन्य विषय समित्यांच्या सभाही डिजिटल पद्धतीने होत आहेत; परंतु महापालिकेतील सत्ताधा-यांतच महासभा घेण्याबाबत मतभिन्नता आहे. म्हणजे, स्थानिक प्रश्नांवर निर्णय घेण्याचे सोडून नाशकातील भाजप राज्य सरकारवर दोषारोप करण्यात धन्यता मानत आहे. संकटकाळातील हे राजकारण मतदारांच्या लक्षात येत नाही, असे नाही. संवेदना गहाण ठेवून प्रदर्शनी आंदोलने करण्यापेक्षा मतदारांच्या प्रश्नांसाठी काही करताना अगर कोरोनामुळे अडचणीत आलेल्या गरजूंच्या मदतीसाठी धावताना संबंधित दिसून आले असते तर त्यांच्या ‘पार्टी विथ डिफरन्ट्स’च्या कथित भूमिकेला साजेसे झाले असते; पण तसे बघावयास मिळाले नाही. अपवाद म्हणून असे करताना जे दिसले तेही स्वत: पदरमोड न करता इतरांच्या खिशात हात घालून सेवा बजावताना दिसले. मग अशांना राज्य सरकारच्या विरोधात अंगणात येऊन ओरडायचा काय नैतिक अधिकार?

टॅग्स :Nashikनाशिक