शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

महानुभाव पंथाचे महंत कारंजेकरबाबा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:26 AM

महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते.

नाशिक : महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते. महानुभाव पंथातील विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा प्रमुख सहभाग होता.कारंजेकरबाबा यांनी दहा वर्षे महानुभाव परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. या कार्यकाळ त्यांनी महानुभाव पंथाच्या प्रचार, प्रसार आणि प्रबोधन कार्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. मूळचे नवी दिल्ली येथील रहिवासी असलेल्या कारंजेकरबाबा यांनी बालवयातच पंथीय ब्रह्मविद्या शास्त्राचे धडे गिरविले. कालांतराने अमरावती येथे त्यांना कविश्वर कुळाची कुलाचार्य महंती प्राप्त झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टÑात तसेच नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात महानुभव पंथियांची श्रीकृष्ण, श्रीदत्त आणि श्रीचक्रधर स्वामींची शेकडो मंदिरे स्थापन झाली. नाशिक जिल्ह्यातील सुकेणे येथील श्री दत्त मंदिराला त्यांनी अनेक वेळा भेट दिली होती.नाशिक, नगर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय महानुभव पंथीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. राज्यभरात त्यांचा शिष्य परिवार असून, दरवर्षी भानखेडी येथे त्यांच्या प्रवचन सोहळ्याला लाखो सद्भक्त हजेरी लावत असत.त्यांच्या जाण्याने पंथाची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत बीडकरबाबा आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेणेकरबाबा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू