शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नाशिकच्या नव्या आयुक्तांसमोर आव्हानांची यादीच मोठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:43 IST

संजय पाठक, नाशिक- तसे आव्हान कोणासमोर नसतात असे नाहीच, महापालिकेचीसूत्रे अचानकपणे बदलली आणि राधाकृष्ण गमे यांच्याऐवजी नाशिकची सूत्रेकैलास जाधव यांच्याकडे गेली. नाशिक शहरात कारोनाबाधीतांची संख्या हीदररोज किमान चारशे ते सातशे होेत असताना नुतन आयुक्तांना ही स्थितीनियंत्रणात आणणे सर्वाधिक आवश्यक झाली आहे.शिवाय आर्थिक घोटाळ्यांमुळेमहापालिकेच्या तिजोरीला पडलेले भगदाड देखील बुजवावे लागणार आहे.

ठळक मुद्देकोरोनाविरोधातील लढाआर्थिक अडचणीघोटाळे रोखणे आवश्यक

संजय पाठक,

नाशिक- तसे आव्हान कोणासमोर नसतात असे नाहीच, महापालिकेचीसूत्रे अचानकपणे बदलली आणि राधाकृष्ण गमे यांच्याऐवजी नाशिकची सूत्रेकैलास जाधव यांच्याकडे गेली. नाशिक शहरात कारोनाबाधीतांची संख्या हीदररोज किमान चारशे ते सातशे होेत असताना नुतन आयुक्तांना ही स्थितीनियंत्रणात आणणे सर्वाधिक आवश्यक झाली आहे.शिवाय आर्थिक घोटाळ्यांमुळेमहापालिकेच्या तिजोरीला पडलेले भगदाड देखील बुजवावे लागणार आहे.महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आधी तुकाराम मुंढेयांची नऊ महिन्याची कारकिर्द अपेक्षेप्रमाणेच गाजली. गमे यांनीत्यांच्याकाळातील विकासाचा वेग कायम ठेवला,परंतु जास्त वाद विवादात नपडता, उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढते ठेवले. महसूलपासून महाबीज पर्यंतआणि थेट जिल्हाधिकारी पद अशा विविध पदांचा अनुभव गाठीशी असलेल्या आणिशासकिय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून त्यांनी नाशिकच्या प्रत्येकवादग्रस्त विषयांची हाताळणी योग्य पध्दतीने केली. घरपट्टीतील वाढीपासूननगररचनात आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे घोळ, रूग्णालयांचे नुतनीकरण असेअनेक वादग्रस्त विषय हाताळत असतानाच गेल्या मार्च महिन्यात आलेल्याकोरोना संकटावर मात करण्यासाठी त्यांनी अत्यंत आघाडीवर राहून कामे केलीतसेच स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक ६७ वरून थेट देशात अकराव्याक्रमांकावर आणणे आणि स्मार्ट सिटीच्या अभियानात नाशिकचा क्रमांक राज्यातप्रथम आणण्यासाठी त्यांचे योगदान चांगलेच होते.आता नव्या आयुक्तांना देखील अनेक आघाड्यांवर लढावे  लागणार आहे. मालेगावसारख्या शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना नाशिक शहर अत्यंत सुरक्षीतहोते. मात्र जून नंतर नाशिकची अवस्था बिकट बनली आहे. नाशिकमध्येबाधीतांची संख्या २२ हजारावर पोहोचली असून मृत्यू झालेल्याची संख्यापावणे पाचशेकडे झेपावली आहे. आता एक सोसायटी अशी नाही की जेथे कोरोनाबाधीत सापडलेला नाही. वाढत्या चाचण्या, डेथ आॅडीट असे शब्द नागरीकांनासांगून उपयोग नाही त्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना नियंत्रणात आणण्याचीगरज आहे. याशिवाय आता राजकिय पातळीवर देखील त्यांना लक्ष पुरवावे लागणारआहे. नाशिक महापालिकेची यंदाची कारकिर्द संपण्यासाठी अवघे दीड वर्षे बाकीआहेत. त्यामुळे नगरसेवकांचा विकास कामांसाठी वाढता दबाव आहे. त्यातच केवळरस्त्यांसाठी एक हजार कोटी तर भूसंपादनासाठी दीडशे कोटींचे कर्जकाढण्याचे घाटत आाहे. वरून बस सेवेचा पांढरा हत्ती पोसावा लागणार आहे.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नाशिक महापालिकेच्या उत्पन्नावर प्रतिकुल परिणामझाला आहे,अशा वेळी भांडवली कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मोठेआव्हान आहे. नाशिक महापालिकेत सातशे सफाई कामगार आऊटसोर्सिंगने भरण्यासाठी ७७ कोटीरूपयांचा ठेका देण्याचा वाद गाजत नाही तोच पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याने १९कोटी रूपयांवरून ४६ कोटींवर उड्डाण घेतले. बस सेवेसाठी सातशे कर्मचारीभरतीचा ठेकाही असाच गाजण्याची चिन्हे आहेत. कोट्यावधींचे गैरव्यवहारम्हणजे महापालिकेच्या तिजोरीला भगदाड होय अशावेळी ही भगदाडे बुजवण्यावरदेखील आयुक्तांना भर द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी