शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसाक्षरतेसाठी गावागावांत घडणार ‘बिबट्यादूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:01 IST

नाशिक : भय इथले संपत नाही... अशीच काही अवस्था नाशिक तालुक्यातील दारणाकाठाची आहे. कारण येथील गावांनी तीन चिमुकले व एका आजोबाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले आहे. या भागात बिबट्याची दहशत कमी व्हावी व हल्ले थांबावे यासाठी वनविभागाने लोकसाक्षरतेच्या दृष्टीने पाऊल उचलत पुन्हा ‘जाणता वाघोबा’ हे जनप्रबोधनपर अभियान राबविण्याची तयारी केली आहे. याद्वारे गावागावांत बिबट्यादूत घडविले जाणार आहे.

नाशिक : (अझहर शेख )भय इथले संपत नाही... अशीच काही अवस्था नाशिक तालुक्यातील दारणाकाठाची आहे. कारण येथील गावांनी तीन चिमुकले व एका आजोबाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले आहे. या भागात बिबट्याची दहशत कमी व्हावी व हल्ले थांबावे यासाठी वनविभागाने लोकसाक्षरतेच्या दृष्टीने पाऊल उचलत पुन्हा ‘जाणता वाघोबा’ हे जनप्रबोधनपर अभियान राबविण्याची तयारी केली आहे. याद्वारे गावागावांत बिबट्यादूत घडविले जाणार आहे.दारणा नदीकाठालगतच्या गावागावांत ऊसशेतीचे क्षेत्र अधिक असून, बिबट्याची दहशत वाढत आहे. येथील बिबट्यांची दहशत कमी व्हावी, यासाठी वनविभागाचे पथक प्रयत्नशील असून, जाखोरीत बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यास यशही मिळाले. दरम्यान, यासोबत नागरिकांनाही बिबट्याचे जीवशास्र माहीत होणे तितकेच गरजेचे आहे, कारण त्याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी रोखता येणे अशक्य होईल.नागरिक सतर्क, सजग झाले तर योग्य ती खबरदारी नक्कीच घेतील आणि बिबट्याचे भय कमी होण्यास मदतही होईल, म्हणूनच हे जनजागृतीपर अभियान वनविभागाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.-----------------..असा आहे ‘जाणता वाघोबा’अभियानाद्वारे शास्रोक्त माहिती व बिबट्याचे जीवशास्र वन्यजीव अभ्यासकांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जाते. बिबट्याच्या सवयी, खाद्य, हल्ल्यांची पद्धत, सक्रि य होण्याची वेळ आदींबाबत जागरूक केले जाते. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये बिबट्याविषयी जागृतीपर कार्यक्र म राबविणे, माहितीपत्रके वाटणे, भित्तिपत्रके लावणे आदीप्रकारे बिबट्याचे भय कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.-------------दोन वर्षांपूर्वी निफाडमध्ये अभियान यशस्वीदोन वर्षांपूर्वी निफाडच्या गोदाकाठावर राबविलेले हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाले. गोदाकाठावरील सायखेडा ते म्हाळसाकोरेपर्यंतच्या विविध गावांनी यामध्ये सहभाग नोंदविला. तेथील सरपंच पोलीसपाटील, शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या सहभागातून गावागावांत बिबट्याचे जीवशास्र सांगणारे बिबट्यादूत घडविले गेले. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायती व उसाची शेती आहे. प्रामुख्याने उसाच्या शेतीत बिबटे दडून राहण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यापूर्वी अनेकदा ऊसतोड कामगारांवर बिबट्यांचे हल्ले झालेले आहेत. या भागात आजही उसात बिबटे आहत; मात्र लोक त्यानुसार खबरदारी घेऊ लागल्याने माणसांवरील हल्ले थांबण्यास मदत झाली.-----------------बिबट्या पूर्वीपासून लोकवस्तीजवळ राहत आलेला आहे. बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार, मात्र यामुळे बिबट्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार नाही. यासाठी निफाड, जुन्नर या शहरांत ज्याप्रमाणे लोकांना बिबट्याविषयी शास्रीय माहिती देत सजग केले गेले, तसेच दारणाकाठाच्या पंचक्रोशीतही जाणता वाघोबाद्वारे करण्याचा मानस आहे. वनविभागाच्या या प्रयत्नांना निश्चितच यश येईल. अर्थात त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यात साथ मिळेल.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक,पश्चिम महाराष्ट्र

टॅग्स :Nashikनाशिक