शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाला प्रारंभ

By admin | Updated: January 23, 2016 23:54 IST

कविसंमेलन : कवींनी मांडल्या भटक्या विमुक्तांच्या जीवन व्यथा

सेनापती तात्या टोपे साहित्यनगरी (येवला) : महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्था आयोजित भटक्या विमुक्तांच्या नवव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला शनिवार, दि. २३ जानेवारी रोजी येथील आसरा लॉन्सवर उभारण्यात आलेल्या थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे साहित्यनगरीत दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला.या प्रसंगी बोलताना प्रा. वा.ना. आंधळे यांनी भटके विमुक्त अजून मागासलेले असून, अद्याप ते दगडच फोडत आहेत. साहित्यातून त्यांच्या जीवनाला नवी पालवी फुटण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी, भटके विमुक्त अजूनही पालातच राहत आहेत. तीन दगडावर संसार मांडला आहे. त्याच्या उत्थानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. याकरिता संघटना प्रमुखांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.उद्घाटन कार्यक्रमानंतर प्राचार्य वा. ना. आंधळे, संमेलनाध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते, श्रीमती रिता जाधव, संस्थापक तथा निमंत्रक प्राचार्य डी.के. गोसावी, स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कविसंमेलनाचे उद्घाटन झाले. प्रत्येक कवीने आपल्या कवितेमधून भटक्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा, दशा मांडण्याचा प्रयत्न केला. मन सुन्न करणाऱ्या कवितांनी साहित्यनगरी गहिवरली. मुंबईपोलीस दलातील महिला कॉस्टेबल रिना जाधव - राठोड यांनी ‘भटक्याची मुलं ही कचरा कुंडीतली फुलं’ या कवितेतून ‘मुक्त भटके आम्ही भटकंती दाही दिशांची’ अशी सुरुवात करून भटक्यांचा उघडा संसार आणि त्याची व्यथा मांडली. त्यानंतर प्रा.वा.ना. आंधळे यांनी आई मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग,मलादेखील पाहू दे,नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे !!परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, त्याच्या जागी तू कसे तुला कळत नाही!!ताईसवे माझ्या मला आनंदाने न्हाऊ दे,नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे !! या कवितेतून स्त्री जन्माची कहाणी मांडली, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. परभणीतील शेलू येथील कवी गौतम सूर्यवंशी यांनी बापानं परंपरागत तुणतुणंभूतकाळाच्या झाडाला टांगल्याने बलुतेदारी तिथेच गेली फासावर मजुरीचे हिशेब बोटावर मोजण्याइतका साक्षर या कवितेतून भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाची व्यथा शब्दबद्ध करत साक्षरतेचा संदेश दिला. हमाली व्यवसाय करत असलेले श्रीरामपूरचे कवी आनंदा साळवे यांनी हातात विळा, पोटाला पिळा, उन्हाच्या प्रहरी,भर दुपारी, गवताचा भारा डोक्यावरी माय रानमाळ फिरायची कधी माय उपाशी पोटी निजायची या कवितेतून आईने उपाशी पोटी राहून उभ्या केलेल्या संसाराचे वर्णन करत. आता पोराबाळांनी आयुष्याचे सोने करावे, असा संदेश कवितेतून दिला. त्यानंतर कवी बापू बैरागी यांनी आयुष्याच्या वाटेवरील पडझड थांबवून चूक सुधारून जीवनाचे सोने करण्याची जाणीव कवितेतून करून दिली.एकापेक्षा एक सरस कवितांनी हे कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. या संमेलनात भास्कर लगड, अ‍ॅड. सुरेश मोकळ, प्रा. रमेश राठोड, संजय वऱ्हाडे, विष्णू भालेरे यांनी आपापल्या कविता सादर केल्या. स्वागताध्यक्ष आणि उपाध्यक्ष ललिता गोसावी, अरु ण ओतारी या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचलन सरचिटणीस बापू बैरागी यांनी केले. यानंतर सायंकाळी पोट धरून हसवणारा विनोदी कलाकार प्रा. विष्णू भारती (दौंड) यांनी बारा बलुतेदाराचा कालवा हा एकपात्री प्रयोग सादर केला. (वार्ताहर)