शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

...केवळ व्यापारी दोषी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:32 AM

राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची कारवाई करताना ज्या वस्तू कंपनीकडूनच प्लॅस्टिक, थर्माकोलमध्ये पॅकिंग होऊन येतात त्यांच्यावर कंपनीतच बंदी करून कारवाई करावी. किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्यास जरूर कारवाई करावी; मात्र कंपनी उत्पादकांकडून प्लॅस्टिक आवरणात आलेल्या वस्तूवरून व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी व्यापाºयांनी बैठकीत केली.

नाशिकरोड : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची कारवाई करताना ज्या वस्तू कंपनीकडूनच प्लॅस्टिक, थर्माकोलमध्ये पॅकिंग होऊन येतात त्यांच्यावर कंपनीतच बंदी करून कारवाई करावी. किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्यास जरूर कारवाई करावी; मात्र कंपनी उत्पादकांकडून प्लॅस्टिक आवरणात आलेल्या वस्तूवरून व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी व्यापाºयांनी बैठकीत केली.  प्लॅस्टिकबंदीवरून जेलरोड बीएमएस सुपर मार्केट येथे शनिवारी सायंकाळी व्यापारी व मनपा अधिकाºयांची संयुक्त बैठक झाली. यावेळी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी कुठल्या प्रकारच्या प्लॅस्टिक, थर्माकोलवर बंदी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाचा होत असलेला ºहास, भविष्यात होणारा त्रास यांची माहिती दिली.  यावेळी व्यापाºयांनी कुठल्याही प्रकारची प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही हे मान्य केले. मात्र उत्पादक, कंपनी, कारखाना यांच्याकडून प्लॅस्टिकच्या आवरणात आलेल्या वस्तू ठेवल्यावर त्यावर कारवाई करू नये अशी मागणी केली. अंतर्वस्त्र, चहा, कॉफी, साड्या, टीव्ही, फ्रीज अशा अनेक वस्तू कंपनी अथवा उत्पादकांकडून प्लॅस्टिकच्या आवरणात येतात. टीव्ही, फ्रीजसारख्या वस्तू वाहतुकीत नुकसान होऊ नये म्हणून थर्माकोलच्या पॅकिंगमध्ये येतात. त्या वस्तू आमच्याकडे विक्रीला आहे म्हणून व्यापाºयांवर कारवाई न करता संबंधित उत्पादक, कारखानदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी व्यापाºयांनी केली. चहा, कॉफी आदी काही खाद्य पदार्थ प्लॅस्टिकमध्ये न आल्यास सादळून जातील. त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान होईल. प्लॅस्टिकबंदी महाराष्टÑात असून, इतर राज्यांतून प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये आणलेल्या मालावरून व्यापाºयांवर कारवाई करू नका, अशी मागणी व्यापा-यांनी केली.  नोटाबंदी, जीएसटी व आता प्लॅस्टिकबंदी करून फक्त व्यापाºयांना वेठीस धरू नये, कोणत्या वस्तूवर बंदी आहे याची दुकानदार व जनतेला माहिती होण्यासाठी फलक लावावे, अशी मागणी व्यापाºयांनी केली. प्लॅस्टिकबंदीमुळे किरकोळ किराणा दुकानदाराने व्यवसाय कसा करावा असे विविध प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केल्यानंतर मनपा अधिकारीसुद्धा अनुत्तरित झाले.  दुकानात असलेला स्टॉक संपेपर्यंत मनपानेदेखील सहकार्य करावे, व्यापारीसुद्धा प्लॅस्टिकचा वापर टाळून सहकार्य करण्यास तयार आहेत; मात्र बंदीच्या नावाखाली पठाणी पद्धतीने कारवाई करू नये अशी मागणी व्यापाºयांनी केली.  बैठकीला नाशिकरोड देवळाली घाऊक व्यापारी असोसिएशनचे राजन दलवाणी, नेमीचंद बेदमुथा, राम साधवानी, सुनील बूब, सुरेश शेटे, रामेश्वर जाजू, दिलीप कोचर, सुंदरदास गोपालदास, होलाराम रामचंदानी, नरेश आमेसर, खुशाल आमेसर, सुभाष बेदमुथा, महावीर कुमट, गोरख शिरसाठ, संजय ताजनपुरे, अशोक कवडे आदींसह व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी