शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘मांजरपाडा’ला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:13 IST

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.सध्या दरसवाडी ते बाळापूर या ४० किमी अंतरात काम सुरू असून, पाणी पोहोचेपर्यंत अनकुटे रेल्वे क्रॉसिंगचेही काम पूर्ण होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २५ जुलै २०१९ रोजी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाले. मांजरपाडा प्रकल्प काही प्रमाणात अपूर्ण असताना गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आले. मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने अवघ्या आठ दिवसात पुणेगाव, ओझरखेड, पालखेड भरले आणि ५ आॅगस्ट २०१९ रोजी ११० क्यूसेसने पुणेगावमधून दरसवाडीत पाणी सोडले गेले. १३ आॅगस्ट २०१९ रोजी अवघ्या आठ दिवसात ५९ किमी अंतर कापत पाणी चांदवड तालुक्यातील भाटगावपर्यंत आले. भाटगावच्या नदीत पाणी टाकून दरसवाडीत जाणे प्रस्तावित असताना परसूलच्या (ता. चांदवड) स्थानिक लोकांनी पाणी भाटगाव नदीऐवजी परसूल नदीत टाकण्याचा हट्ट धरला. परिणामी, पाणी परसूलमध्ये टाकले गेले. त्यासाठी परसूलचे ३ मोठे बंधारे भरावे लागले. २८ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी पाणी दरसवाडीत पोहोचले. पुढे २२ दिवसात मांजरपाड्याच्या पाण्याने दरसवाडी धरण भरले आणि २० सप्टेंबर २०१९ रोजी दरसवाडी कालव्याचे गेट उघडून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहितझाले.---------------------------------------दरसवाडी भरण्याची अपेक्षापुणेगाव ते दरसवाडीमधील १ ते २५ किमी कालवा रु ंदीकरण करून २२० क्यूसेस वहनक्षमतेचा करण्यात आला आहे. वणी येथील बोगद्याचे विस्तारीकरणाचे काम तांत्रिक कारणाने अपूर्ण राहिले असले तरी निश्चितच मागील वेळेपेक्षा जास्त वहनक्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव दरसवाडी १ ते ६३ किमीमधील कालवा सफाई झाली आहे. दरसवाडी धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दरसवाडी भरण्यास वेळ लागणार नाही. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये कालवा दुरु स्ती, लेव्हलची कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोना संकटामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही. तरीदेखील आहे त्या पाण्यात निश्चितच पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.---------------------------------------कोरोना संकट आले नसते तर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण पाणी गोदावरी खोऱ्यात आले असते. तरीदेखील पुणेगाव-दरसवाडी कालवा रूंदीकरण आणि दुरु स्ती मार्च अगोदर पूर्ण झाली आहे. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये काम सुरू आहे. पाणी येईपर्यंत अनकुटे रेल्वे क्र ॉसिंगचे काम पूर्ण होईल. पाणी डोंगरगावपर्यंत निश्चित पोहोचेल, अशी खात्री आहे.- मोहन शेलारआंदोलक, विखरणी

टॅग्स :Nashikनाशिक