शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘मांजरपाडा’ला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:13 IST

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.सध्या दरसवाडी ते बाळापूर या ४० किमी अंतरात काम सुरू असून, पाणी पोहोचेपर्यंत अनकुटे रेल्वे क्रॉसिंगचेही काम पूर्ण होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २५ जुलै २०१९ रोजी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाले. मांजरपाडा प्रकल्प काही प्रमाणात अपूर्ण असताना गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आले. मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने अवघ्या आठ दिवसात पुणेगाव, ओझरखेड, पालखेड भरले आणि ५ आॅगस्ट २०१९ रोजी ११० क्यूसेसने पुणेगावमधून दरसवाडीत पाणी सोडले गेले. १३ आॅगस्ट २०१९ रोजी अवघ्या आठ दिवसात ५९ किमी अंतर कापत पाणी चांदवड तालुक्यातील भाटगावपर्यंत आले. भाटगावच्या नदीत पाणी टाकून दरसवाडीत जाणे प्रस्तावित असताना परसूलच्या (ता. चांदवड) स्थानिक लोकांनी पाणी भाटगाव नदीऐवजी परसूल नदीत टाकण्याचा हट्ट धरला. परिणामी, पाणी परसूलमध्ये टाकले गेले. त्यासाठी परसूलचे ३ मोठे बंधारे भरावे लागले. २८ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी पाणी दरसवाडीत पोहोचले. पुढे २२ दिवसात मांजरपाड्याच्या पाण्याने दरसवाडी धरण भरले आणि २० सप्टेंबर २०१९ रोजी दरसवाडी कालव्याचे गेट उघडून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहितझाले.---------------------------------------दरसवाडी भरण्याची अपेक्षापुणेगाव ते दरसवाडीमधील १ ते २५ किमी कालवा रु ंदीकरण करून २२० क्यूसेस वहनक्षमतेचा करण्यात आला आहे. वणी येथील बोगद्याचे विस्तारीकरणाचे काम तांत्रिक कारणाने अपूर्ण राहिले असले तरी निश्चितच मागील वेळेपेक्षा जास्त वहनक्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव दरसवाडी १ ते ६३ किमीमधील कालवा सफाई झाली आहे. दरसवाडी धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दरसवाडी भरण्यास वेळ लागणार नाही. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये कालवा दुरु स्ती, लेव्हलची कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोना संकटामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही. तरीदेखील आहे त्या पाण्यात निश्चितच पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.---------------------------------------कोरोना संकट आले नसते तर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण पाणी गोदावरी खोऱ्यात आले असते. तरीदेखील पुणेगाव-दरसवाडी कालवा रूंदीकरण आणि दुरु स्ती मार्च अगोदर पूर्ण झाली आहे. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये काम सुरू आहे. पाणी येईपर्यंत अनकुटे रेल्वे क्र ॉसिंगचे काम पूर्ण होईल. पाणी डोंगरगावपर्यंत निश्चित पोहोचेल, अशी खात्री आहे.- मोहन शेलारआंदोलक, विखरणी

टॅग्स :Nashikनाशिक