शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘मांजरपाडा’ला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:13 IST

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.सध्या दरसवाडी ते बाळापूर या ४० किमी अंतरात काम सुरू असून, पाणी पोहोचेपर्यंत अनकुटे रेल्वे क्रॉसिंगचेही काम पूर्ण होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २५ जुलै २०१९ रोजी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाले. मांजरपाडा प्रकल्प काही प्रमाणात अपूर्ण असताना गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आले. मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने अवघ्या आठ दिवसात पुणेगाव, ओझरखेड, पालखेड भरले आणि ५ आॅगस्ट २०१९ रोजी ११० क्यूसेसने पुणेगावमधून दरसवाडीत पाणी सोडले गेले. १३ आॅगस्ट २०१९ रोजी अवघ्या आठ दिवसात ५९ किमी अंतर कापत पाणी चांदवड तालुक्यातील भाटगावपर्यंत आले. भाटगावच्या नदीत पाणी टाकून दरसवाडीत जाणे प्रस्तावित असताना परसूलच्या (ता. चांदवड) स्थानिक लोकांनी पाणी भाटगाव नदीऐवजी परसूल नदीत टाकण्याचा हट्ट धरला. परिणामी, पाणी परसूलमध्ये टाकले गेले. त्यासाठी परसूलचे ३ मोठे बंधारे भरावे लागले. २८ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी पाणी दरसवाडीत पोहोचले. पुढे २२ दिवसात मांजरपाड्याच्या पाण्याने दरसवाडी धरण भरले आणि २० सप्टेंबर २०१९ रोजी दरसवाडी कालव्याचे गेट उघडून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहितझाले.---------------------------------------दरसवाडी भरण्याची अपेक्षापुणेगाव ते दरसवाडीमधील १ ते २५ किमी कालवा रु ंदीकरण करून २२० क्यूसेस वहनक्षमतेचा करण्यात आला आहे. वणी येथील बोगद्याचे विस्तारीकरणाचे काम तांत्रिक कारणाने अपूर्ण राहिले असले तरी निश्चितच मागील वेळेपेक्षा जास्त वहनक्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव दरसवाडी १ ते ६३ किमीमधील कालवा सफाई झाली आहे. दरसवाडी धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दरसवाडी भरण्यास वेळ लागणार नाही. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये कालवा दुरु स्ती, लेव्हलची कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोना संकटामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही. तरीदेखील आहे त्या पाण्यात निश्चितच पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.---------------------------------------कोरोना संकट आले नसते तर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण पाणी गोदावरी खोऱ्यात आले असते. तरीदेखील पुणेगाव-दरसवाडी कालवा रूंदीकरण आणि दुरु स्ती मार्च अगोदर पूर्ण झाली आहे. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये काम सुरू आहे. पाणी येईपर्यंत अनकुटे रेल्वे क्र ॉसिंगचे काम पूर्ण होईल. पाणी डोंगरगावपर्यंत निश्चित पोहोचेल, अशी खात्री आहे.- मोहन शेलारआंदोलक, विखरणी

टॅग्स :Nashikनाशिक