शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींचा आदर्श ठेवावा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:46 IST

सध्या सत्यावर असत्य मात करण्याचा प्रयत्न करीत असून, खोटं बोला पण रेटून बोला, अशी प्रवृत्ती वाढत आहे. मात्र जात-पात न मानता रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

नाशिकरोड : सध्या सत्यावर असत्य मात करण्याचा प्रयत्न करीत असून, खोटं बोला पण रेटून बोला, अशी प्रवृत्ती वाढत आहे. मात्र जात-पात न मानता रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.  जेलरोड ज्ञानेश्वरनगर येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शंभूराजे गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्हीही छत्रपती युगपुरुष होते. मात्र छत्रपती संभाजी राजांचा इतिहास काही प्रवृत्तींनी खोटा व चुकीच्या पद्धतीने सांगितला, मांडला हे खरोखरच दुर्दैवी आहे. दोन्ही छत्रपतींनी ४०० वर्षांपूर्वी जात-पात, धर्माचे राजकारण न करता रयतेचे स्वराज्य स्थापन केले. मात्र आता एकसारखा जातीय तणाव निर्माण केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेली दंगल, काही दिवसांपूर्वी कोरेगांव भीमा येथे झालेला प्रकार जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. जाणीवपूर्वक असे प्रकार घडविले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.  आपल्याकडे इतकी साखर आहे ती आपण इतर राष्टÑांना देऊ शकतो. तरी देखील पाकिस्तानमधुन साखर आयात करून आपल्या शेतकऱ्यांची साखर मातीमोल किमतीत करण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविले जात नाही. उलट त्यांच्या समस्या, अडचणी वाढत चालल्या आहेत. दोन्ही छत्रपतींना हे मान्यनव्हते. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले असे पवार यांनी स्पष्ट केले. सध्या जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता इतरांना आरक्षण दिलेच पाहिजे. स्वच्छतेच्या नावाने फोटोसेशन केले जात आहे. तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांना मागे करून फोटोबाजी केली जात आहे.  यामध्ये लोकसहभाग अत्यंत कमी आहे. जातीयवाद्याचे राजकारण लक्षात घेऊन प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची पाळी आली आहे. अन्याय, अत्याचाराला बळी न पडता दोन्ही छत्रपतींचे विचार व आचरण डोळ्यासमोर ठेवुन वाटचाल केल्यास समाजाचा विकास व प्रगती होईल असे पवार यांनी स्पष्ट केले.  यावेळी आमदार जयंत जाधव, राष्टÑवादीचे शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, अनिता भामरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक योगेश निसाळ यांनी केले. आभार मनोहर कोरडे यांनी मानले. यावेळी सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास व कार्याची माहिती पोवाड्यातून दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार