शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

वनसंरक्षण ‘रामभरोसे’ संवर्धन होणार कसे?

By admin | Updated: July 23, 2014 00:27 IST

वनसंवर्धन दिन : उदासीनतेमुळे जंगलतोड सुरूच

नाशिक ; वाढत्या जंगलतोडीला आळा बसविण्यासाठी शासनानेच पुढाकार घेत आदिवासी बांधवांसाठी शासकीय योजनेतून स्वयंपाकाच्या गॅसची योजना आखली खरी, मात्र शासनाच्याच उदासीनतेमुळे ती बारगळली असून, गेल्या वर्षभरात योजनेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थींना अनुदान न मिळाल्याने त्यांच्या चुलीसाठी आजही जंगलातील वृक्षांचीच राख होते आहे. त्यामुळे वनसंरक्षणाचेच उपाय त्रोटक ठरत असल्याने संवर्धन तरी कसे होणार, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात लागवड केलेल्या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी वनविभागाची असली तरी, त्याचे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. तरीही जितकी रोपे लावली जातात त्यापैकी जिवंत रोपांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमीच असते, मात्र हेच प्रमाण शासकीय पातळीवर ८० टक्के सांगितले जाते हे विशेष.
गेल्या कित्येक वर्षांपासूनची जंगलतोडीची समस्या नाशिक वनविभागासमोर कायम असून, ती रोखण्यासाठी आत्तापर्यंत अपयशच आले आहे. त्यासाठी शासनाने जंगलात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांमध्ये जगजागृतीचेही उपक्रम राबविले, तरीही जंगलतोड सुरूच राहिली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शासनाने आदिवासींसाठी २५ टक्के सबसिडीवर स्वयंपाकाच्या गॅसची योजना आखली. आदिवासी व वनविभाग यांच्या संयुक्त सहयोगातून सदरचा उपक्रम राबविला गेला. मात्र, जिल्ह्याच्या पश्चिम वनविभागातील आदिवासी तालुक्यातील आदिवासी लाभार्थींवर योजनेत सहभाग होऊनही शासनाच्या उदासीनतेमुळे वंचित राहण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांना पुन्हा स्वयंपाकासाठीच्या जळणासाठी जंगलतोडीकडेच वळावे लागल्याने शासनच वनसंवर्धनाबाबत गंभीर नसल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.