शहरं
Join us  
Trending Stories
1
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
2
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
3
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
4
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
5
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
6
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
7
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
8
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
9
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
10
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
11
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
12
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
13
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
14
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
15
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
16
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
17
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
18
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
19
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
20
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन असलेल्या भाजपला बुरे दिनची भीती!

By संजय पाठक | Updated: November 2, 2019 18:13 IST

कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली

ठळक मुद्दे* जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची भीती योग्य* विधानसभा निवडणुकीत कष्टसाध्य यश* पक्ष संघटनेकडे होतेय दुर्लक्ष

संजय पाठकनाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाची गाडी सुसाट जाईल, असे मानले जात असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. नाशिक पुरताच विचार करायचा तर आत्तापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणजे १५ पैकी ५ जागा मिळाल्या खऱ्या, परंतु त्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्यातून हा पक्ष जमिनीवर आला असं म्हणावं लागेल. विशेषत: मूळ भाजपेयींनी त्यावर खल केला ही सकारात्मक बाजू मानवी लागेल!कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ती दुर्लक्ष करण्यासारखी नाहीच, परंतु आता पक्षाला अच्छे दिन आल्याचा आभास असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे.यंदा भाजपला विधानसभा निवडणुकीत १५ पैकी ५ जागा मिळाल्याने आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. भाजपने १९९९ पर्यंत विधानसभा निवडणुकीत तीन जागा मिळवण्यापलीकडे मजल मारली नव्हती. १९९९ मध्ये भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्या ५ झाल्या आहेत, मात्र बागलाण वगळता सर्वच जागा मिळवताना दमछाक झाली. देवळा, चांदवडमध्ये आमदार डॉ. राहुल आहेर यांची दमछाक झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथे सभा घेताना डॉ. आहेर यांना निवडून दिल्यास मंत्रिपद देऊ असे जाहीर करावे लागले. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने लगोलग पक्षाने आजवर सत्तापदांची बरसात केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन भाजपला आव्हान देणारे बाळासाहेब सानप अडचणीचे ठरले आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली. कसेबसे तेथे यश मिळाले. नाशिक पश्चिममध्ये मित्रपक्ष शिवसेनेचे बंड आणि भाजपमधील फितूर असे आव्हान कसे बसे पेलले गेले. मध्य नाशिकमध्ये सुरुवातीला आमदार देवयानी फरांदे यांचा एकतर्फी वाटणारा विजय नंतर तसा वाटला नाही. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या डॉ. हेमलता पाटील यांनी ४५ हजार मते मिळवली आणि मनसेच्या नितीन भोसले यांनी २२ हजार मते मिळवली. म्हणजे एकास एक विरोधी उमेदवार दिला असता तर भाजपला निवडणूक कठीण गेली असती. फरांदे यांनी गेल्या निवडणुकीत जो लीड मिळवला तेवढाच साधारणत: यंदाही कायम ठेवला. कथितरीत्या एकतर्फी निवडणूक असूनही तसे मताधिक्यात दिसले नाही.असं का घडलं ? याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या तुलनेत पक्षाला दिले गेलेले दुय्यमस्थान! २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली. नाशिक शहरात ४ पैकी तीन जागा मिळाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले. मनपाच्या इतिहासात प्रथमच ६६ उमेदवार विजयी झाल्याने पाशवी बहुमत मिळाले. त्यामुळे सत्ता म्हणजे सर्वस्व अशी स्थिती झाली. संघटनेत पदे खिरापतीसाठी वाटली, परंतु त्याचे गांभीर्य नाही. साप्ताहिक बैठका, मासिक बैठका सर्व काही बंद. पूर्वी कोणत्याही राष्ट्रपुरुष किंवा नेत्याची जयंती, पुण्यतिथी असो नगरसेवक आणि पदाधिकारी सर्व हजर असत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ मध्ये भाजपचे शहरातच तीन आमदार निवडून आले. २०१७ मध्ये नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले आणि ६६ नगरसेवक निवडून आले त्यात मूळ भाजपचे अवघे १० ते १५ नगरसेवक बाकी सर्व आयराम! पक्ष माहीत नाही पक्षाचे नियम आणि शिस्त माहीत नाही मग काय होणार? बरे तर आयारामांना नसेल माहिती शिस्त, मग ती शिकवायची कोणी? सत्तेच्या मदात सारेच धुंद झाल्याने संघटनेकडे दुर्लक्ष होत गेले. संघटनेला दुय्यम स्थान मिळाले. पक्षाच्या निष्ठेपोटी असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आयारामांना मनाचे पान मिळू लागले. अस्सल कार्यकर्ते दूर होऊन पेड कार्यकर्ते वाढले. या सर्वांचाच परिपाक म्हणून निवडणुका खडतर ठरल्या.विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतरही विजय साने, योगेश हिरे, बाळासाहेब पाटील, गणेश कांबळे या जुन्या नेत्या कार्यकर्त्यांनी वेळीच पक्षाला भान आणून दिले हे चांगलेच झाले. आता त्यावर किती गांभीर्याने अंमलबजावणी होते ते महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपा