शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

अच्छे दिन असलेल्या भाजपला बुरे दिनची भीती!

By संजय पाठक | Updated: November 2, 2019 18:13 IST

कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली

ठळक मुद्दे* जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची भीती योग्य* विधानसभा निवडणुकीत कष्टसाध्य यश* पक्ष संघटनेकडे होतेय दुर्लक्ष

संजय पाठकनाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाची गाडी सुसाट जाईल, असे मानले जात असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. नाशिक पुरताच विचार करायचा तर आत्तापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणजे १५ पैकी ५ जागा मिळाल्या खऱ्या, परंतु त्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्यातून हा पक्ष जमिनीवर आला असं म्हणावं लागेल. विशेषत: मूळ भाजपेयींनी त्यावर खल केला ही सकारात्मक बाजू मानवी लागेल!कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ती दुर्लक्ष करण्यासारखी नाहीच, परंतु आता पक्षाला अच्छे दिन आल्याचा आभास असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे.यंदा भाजपला विधानसभा निवडणुकीत १५ पैकी ५ जागा मिळाल्याने आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. भाजपने १९९९ पर्यंत विधानसभा निवडणुकीत तीन जागा मिळवण्यापलीकडे मजल मारली नव्हती. १९९९ मध्ये भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्या ५ झाल्या आहेत, मात्र बागलाण वगळता सर्वच जागा मिळवताना दमछाक झाली. देवळा, चांदवडमध्ये आमदार डॉ. राहुल आहेर यांची दमछाक झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथे सभा घेताना डॉ. आहेर यांना निवडून दिल्यास मंत्रिपद देऊ असे जाहीर करावे लागले. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने लगोलग पक्षाने आजवर सत्तापदांची बरसात केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन भाजपला आव्हान देणारे बाळासाहेब सानप अडचणीचे ठरले आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली. कसेबसे तेथे यश मिळाले. नाशिक पश्चिममध्ये मित्रपक्ष शिवसेनेचे बंड आणि भाजपमधील फितूर असे आव्हान कसे बसे पेलले गेले. मध्य नाशिकमध्ये सुरुवातीला आमदार देवयानी फरांदे यांचा एकतर्फी वाटणारा विजय नंतर तसा वाटला नाही. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या डॉ. हेमलता पाटील यांनी ४५ हजार मते मिळवली आणि मनसेच्या नितीन भोसले यांनी २२ हजार मते मिळवली. म्हणजे एकास एक विरोधी उमेदवार दिला असता तर भाजपला निवडणूक कठीण गेली असती. फरांदे यांनी गेल्या निवडणुकीत जो लीड मिळवला तेवढाच साधारणत: यंदाही कायम ठेवला. कथितरीत्या एकतर्फी निवडणूक असूनही तसे मताधिक्यात दिसले नाही.असं का घडलं ? याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या तुलनेत पक्षाला दिले गेलेले दुय्यमस्थान! २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली. नाशिक शहरात ४ पैकी तीन जागा मिळाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले. मनपाच्या इतिहासात प्रथमच ६६ उमेदवार विजयी झाल्याने पाशवी बहुमत मिळाले. त्यामुळे सत्ता म्हणजे सर्वस्व अशी स्थिती झाली. संघटनेत पदे खिरापतीसाठी वाटली, परंतु त्याचे गांभीर्य नाही. साप्ताहिक बैठका, मासिक बैठका सर्व काही बंद. पूर्वी कोणत्याही राष्ट्रपुरुष किंवा नेत्याची जयंती, पुण्यतिथी असो नगरसेवक आणि पदाधिकारी सर्व हजर असत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ मध्ये भाजपचे शहरातच तीन आमदार निवडून आले. २०१७ मध्ये नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले आणि ६६ नगरसेवक निवडून आले त्यात मूळ भाजपचे अवघे १० ते १५ नगरसेवक बाकी सर्व आयराम! पक्ष माहीत नाही पक्षाचे नियम आणि शिस्त माहीत नाही मग काय होणार? बरे तर आयारामांना नसेल माहिती शिस्त, मग ती शिकवायची कोणी? सत्तेच्या मदात सारेच धुंद झाल्याने संघटनेकडे दुर्लक्ष होत गेले. संघटनेला दुय्यम स्थान मिळाले. पक्षाच्या निष्ठेपोटी असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आयारामांना मनाचे पान मिळू लागले. अस्सल कार्यकर्ते दूर होऊन पेड कार्यकर्ते वाढले. या सर्वांचाच परिपाक म्हणून निवडणुका खडतर ठरल्या.विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतरही विजय साने, योगेश हिरे, बाळासाहेब पाटील, गणेश कांबळे या जुन्या नेत्या कार्यकर्त्यांनी वेळीच पक्षाला भान आणून दिले हे चांगलेच झाले. आता त्यावर किती गांभीर्याने अंमलबजावणी होते ते महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपा