शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

अच्छे दिन असलेल्या भाजपला बुरे दिनची भीती!

By संजय पाठक | Updated: November 2, 2019 18:13 IST

कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली

ठळक मुद्दे* जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची भीती योग्य* विधानसभा निवडणुकीत कष्टसाध्य यश* पक्ष संघटनेकडे होतेय दुर्लक्ष

संजय पाठकनाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाची गाडी सुसाट जाईल, असे मानले जात असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. नाशिक पुरताच विचार करायचा तर आत्तापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणजे १५ पैकी ५ जागा मिळाल्या खऱ्या, परंतु त्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्यातून हा पक्ष जमिनीवर आला असं म्हणावं लागेल. विशेषत: मूळ भाजपेयींनी त्यावर खल केला ही सकारात्मक बाजू मानवी लागेल!कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ती दुर्लक्ष करण्यासारखी नाहीच, परंतु आता पक्षाला अच्छे दिन आल्याचा आभास असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे.यंदा भाजपला विधानसभा निवडणुकीत १५ पैकी ५ जागा मिळाल्याने आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. भाजपने १९९९ पर्यंत विधानसभा निवडणुकीत तीन जागा मिळवण्यापलीकडे मजल मारली नव्हती. १९९९ मध्ये भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्या ५ झाल्या आहेत, मात्र बागलाण वगळता सर्वच जागा मिळवताना दमछाक झाली. देवळा, चांदवडमध्ये आमदार डॉ. राहुल आहेर यांची दमछाक झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथे सभा घेताना डॉ. आहेर यांना निवडून दिल्यास मंत्रिपद देऊ असे जाहीर करावे लागले. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने लगोलग पक्षाने आजवर सत्तापदांची बरसात केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन भाजपला आव्हान देणारे बाळासाहेब सानप अडचणीचे ठरले आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली. कसेबसे तेथे यश मिळाले. नाशिक पश्चिममध्ये मित्रपक्ष शिवसेनेचे बंड आणि भाजपमधील फितूर असे आव्हान कसे बसे पेलले गेले. मध्य नाशिकमध्ये सुरुवातीला आमदार देवयानी फरांदे यांचा एकतर्फी वाटणारा विजय नंतर तसा वाटला नाही. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या डॉ. हेमलता पाटील यांनी ४५ हजार मते मिळवली आणि मनसेच्या नितीन भोसले यांनी २२ हजार मते मिळवली. म्हणजे एकास एक विरोधी उमेदवार दिला असता तर भाजपला निवडणूक कठीण गेली असती. फरांदे यांनी गेल्या निवडणुकीत जो लीड मिळवला तेवढाच साधारणत: यंदाही कायम ठेवला. कथितरीत्या एकतर्फी निवडणूक असूनही तसे मताधिक्यात दिसले नाही.असं का घडलं ? याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या तुलनेत पक्षाला दिले गेलेले दुय्यमस्थान! २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली. नाशिक शहरात ४ पैकी तीन जागा मिळाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले. मनपाच्या इतिहासात प्रथमच ६६ उमेदवार विजयी झाल्याने पाशवी बहुमत मिळाले. त्यामुळे सत्ता म्हणजे सर्वस्व अशी स्थिती झाली. संघटनेत पदे खिरापतीसाठी वाटली, परंतु त्याचे गांभीर्य नाही. साप्ताहिक बैठका, मासिक बैठका सर्व काही बंद. पूर्वी कोणत्याही राष्ट्रपुरुष किंवा नेत्याची जयंती, पुण्यतिथी असो नगरसेवक आणि पदाधिकारी सर्व हजर असत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ मध्ये भाजपचे शहरातच तीन आमदार निवडून आले. २०१७ मध्ये नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले आणि ६६ नगरसेवक निवडून आले त्यात मूळ भाजपचे अवघे १० ते १५ नगरसेवक बाकी सर्व आयराम! पक्ष माहीत नाही पक्षाचे नियम आणि शिस्त माहीत नाही मग काय होणार? बरे तर आयारामांना नसेल माहिती शिस्त, मग ती शिकवायची कोणी? सत्तेच्या मदात सारेच धुंद झाल्याने संघटनेकडे दुर्लक्ष होत गेले. संघटनेला दुय्यम स्थान मिळाले. पक्षाच्या निष्ठेपोटी असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आयारामांना मनाचे पान मिळू लागले. अस्सल कार्यकर्ते दूर होऊन पेड कार्यकर्ते वाढले. या सर्वांचाच परिपाक म्हणून निवडणुका खडतर ठरल्या.विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतरही विजय साने, योगेश हिरे, बाळासाहेब पाटील, गणेश कांबळे या जुन्या नेत्या कार्यकर्त्यांनी वेळीच पक्षाला भान आणून दिले हे चांगलेच झाले. आता त्यावर किती गांभीर्याने अंमलबजावणी होते ते महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपा