शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

गर्दी जमली म्हणजे मते मिळालीच असे नव्हे !

By श्याम बागुल | Updated: January 15, 2019 15:35 IST

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली,

ठळक मुद्दे दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली

श्याम बागुलनाशिक : दलीतांना काळाराम मंदिराचे कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भुमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली,त्याच भुमीत त्यांचे नातु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा व विधासभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एमआयएमसोबत जाहीर सभा घेवून घडविलेले शक्तीप्रदर्शनाने अन्य राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरणे स्वाभाविक असले तरी, ज्या सत्तेविरूद्ध प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिमांना एकत्र करून रान पेटवित आहे, त्या दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे जाहीरसभेपुरती मोठी गर्दी जमली म्हणजे त्याचे रूपांतर मतांमध्ये होतेच असे नाही, या अनेकांच्या अनुभवाशी प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीनंतर सहमत व्हावेच लागेल.कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली, त्याचाच नेमका फायदा प्रकाश आंबेडकरांनी उठविला व खऱ्या अर्थाने त्याचे राजकीयकरण सुरू झाले. केंद्र व राज्य सरकार विरोधातील वातावरणाचा लाभ एकीकडे घेत असताना दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकर यांनी दर्शविली परंतु त्यांच्या या तयारीकडे आजही दलीत समाज संशयाने पाहत आहे. कॉँग्रेसशी निवडणूक बोलणी करायची परंतु राष्टÑवादी नको असे दुसरीकडे म्हणायचे, लोकसभेत आंबेडकरांचा एकही प्रतिनिधी नसताना थेट बारा जागांची मागणी करायची व अचानक एमआयएम या पक्षाशी निवडणूक युती करून प्रचाराचा रणश्ािंग फुंकायचा, त्याच बरोबर नको असलेल्या राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेवून राजकीय चर्चा घडवाची, जाहीर सभेतून सेना-भाजपावर टोकाची टिका करून त्यांना निवडणूक युतीसाठी एकत्र येण्यासाठी भाग पाडायचे अशा एक नव्हे एकाच वेळी अनेक खेळी प्रकाश आंबेडकर खेळत आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच भूमिकेविषयी संशय व्यक्त होणे साहजिक असून, भारतीय संविधानाला दुय्यम स्थान देवून कट्टर धर्मांधता जोपासणा-या एमआयएम यासारख्या पक्षाला सोबत घेण्याची त्यांची भूमिकाही तितकीच अनाकलनीय आहे. एकीकडे संविधानाला हात लावण्यास विरोध करायचा व दुसरीकडे संविधानाला आव्हान देणा-या पक्षाबरोबर निवडणूक युतीचा समझोता करायचा हा आंबेडकर यांच्या दुटप्पीपणाबाबत दलीत समाजात संभ्रम आहे. नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली त्याबाबत त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, कारण गोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्याच पक्षांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. आंबेडकर यांनी निवडणूक पुर्व तयारीत मारलेली बाजी यशस्वी ठरली असली तरी, याच गोल्फ क्लबच्या मैदानावर लाखोंच्या सभा घेणा-या राजकीय पक्षांना मात्र निवडणुकीत सभेतील गर्दी इतकी मते मिळाली नाहीत हा देखील इतिहास आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन