शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी जमली म्हणजे मते मिळालीच असे नव्हे !

By श्याम बागुल | Updated: January 15, 2019 15:35 IST

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली,

ठळक मुद्दे दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली

श्याम बागुलनाशिक : दलीतांना काळाराम मंदिराचे कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भुमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली,त्याच भुमीत त्यांचे नातु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा व विधासभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एमआयएमसोबत जाहीर सभा घेवून घडविलेले शक्तीप्रदर्शनाने अन्य राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरणे स्वाभाविक असले तरी, ज्या सत्तेविरूद्ध प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिमांना एकत्र करून रान पेटवित आहे, त्या दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे जाहीरसभेपुरती मोठी गर्दी जमली म्हणजे त्याचे रूपांतर मतांमध्ये होतेच असे नाही, या अनेकांच्या अनुभवाशी प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीनंतर सहमत व्हावेच लागेल.कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली, त्याचाच नेमका फायदा प्रकाश आंबेडकरांनी उठविला व खऱ्या अर्थाने त्याचे राजकीयकरण सुरू झाले. केंद्र व राज्य सरकार विरोधातील वातावरणाचा लाभ एकीकडे घेत असताना दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकर यांनी दर्शविली परंतु त्यांच्या या तयारीकडे आजही दलीत समाज संशयाने पाहत आहे. कॉँग्रेसशी निवडणूक बोलणी करायची परंतु राष्टÑवादी नको असे दुसरीकडे म्हणायचे, लोकसभेत आंबेडकरांचा एकही प्रतिनिधी नसताना थेट बारा जागांची मागणी करायची व अचानक एमआयएम या पक्षाशी निवडणूक युती करून प्रचाराचा रणश्ािंग फुंकायचा, त्याच बरोबर नको असलेल्या राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेवून राजकीय चर्चा घडवाची, जाहीर सभेतून सेना-भाजपावर टोकाची टिका करून त्यांना निवडणूक युतीसाठी एकत्र येण्यासाठी भाग पाडायचे अशा एक नव्हे एकाच वेळी अनेक खेळी प्रकाश आंबेडकर खेळत आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच भूमिकेविषयी संशय व्यक्त होणे साहजिक असून, भारतीय संविधानाला दुय्यम स्थान देवून कट्टर धर्मांधता जोपासणा-या एमआयएम यासारख्या पक्षाला सोबत घेण्याची त्यांची भूमिकाही तितकीच अनाकलनीय आहे. एकीकडे संविधानाला हात लावण्यास विरोध करायचा व दुसरीकडे संविधानाला आव्हान देणा-या पक्षाबरोबर निवडणूक युतीचा समझोता करायचा हा आंबेडकर यांच्या दुटप्पीपणाबाबत दलीत समाजात संभ्रम आहे. नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली त्याबाबत त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, कारण गोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्याच पक्षांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. आंबेडकर यांनी निवडणूक पुर्व तयारीत मारलेली बाजी यशस्वी ठरली असली तरी, याच गोल्फ क्लबच्या मैदानावर लाखोंच्या सभा घेणा-या राजकीय पक्षांना मात्र निवडणुकीत सभेतील गर्दी इतकी मते मिळाली नाहीत हा देखील इतिहास आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन