शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

फंडींगसाठीची मोर्चेबांधणी आली कामाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST

नाशिक : नाशकात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या फंडींगसाठी आयोजकांकडून करण्यात आलेली मोर्चेबांधणी कामी आल्याने लोकहितवादी मंडळाच्या धुरिणांनी उपाध्यक्षपदांवर तसेच सल्लागार ...

नाशिक : नाशकात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या फंडींगसाठी आयोजकांकडून करण्यात आलेली मोर्चेबांधणी कामी आल्याने लोकहितवादी मंडळाच्या धुरिणांनी उपाध्यक्षपदांवर तसेच सल्लागार समित्यांमध्ये केलेली महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेतृत्वाची नियुक्ती उपयुक्त ठरल्याच्या चर्चेला त्यामुळे बहर आला आहे.

नाशिकचे साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याने या संमेलनाला गर्दीदेखील कमी हाेईल, त्यामुळे खर्चदेखील कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या संमेलनासाठी निर्धारित ५० लाखांऐवजी केवळ ३३ टक्के म्हणजेच केवळ १७ लाख रुपयांचे अनुदान मिळेल, अशी चर्चा साहित्य संमेलनाच्या आयोजनापूर्वीपासून होती. त्यामुळेच कमी अनुदानात संमेलन भरविण्यासाठी फारसे कुणी इच्छुक नव्हते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साहित्य संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिककरांच्या निर्णयाला धाडसी म्हटले होते. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने संमेलन आयोजनाचा प्रस्ताव देण्यापासूनच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजळ यांना या बाबींची कल्पना देऊन संमेलनाच्या पूर्ण अनुदानासाठी आग्रही राहण्याची विनंती केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राष्ट्रवादीचे खजिनदार असलेले माजी आमदार हेमंत टकले हेच लोकहितवादीचे विश्वस्त असल्याने पूर्ण अनुदानाच्या लॉबिंगला त्यांचादेखील हातभार लागला असणार. तसेच संमेलनाची कार्यकारिणी जाहीर करताना लोकहितवादी मंडळाने स्वागताध्यक्षपदी भुजबळ, तर उपाध्यक्षपदांवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच कृषिमंत्री दादा भुसे यांचीदेखील वर्णी लावून फंडींगसाठी चारही बाजूने केलेली कडेकोट सज्जता कामी आल्याचेच यामुळे दिसून येत आहे.

इन्फो

अडीच कोटींची तयारी

साहित्य संमेलनासाठीच्या खर्चात विविध कारणांनी वाढ झाली तरी सर्व प्रकारची सज्जता असावी, यासाठी किमान सव्वादोन ते अडीच कोटी रुपयांची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठीच सल्लागार आणि मार्गदर्शक समितीमध्ये अखेरच्या क्षणी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची तजवीज करण्यात आली आहे. त्याशिवाय नाशिक महानगरपालिकेकडे ५० लाखांची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेकडूनही निधीसाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्याच्या निर्मितीला १५१ वर्षे झाल्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडूनदेखील निधी मिळू शकतो का, यासाठीदेखील आयोजकांचे प्रयत्न सुुरू आहेत.

इन्फो

स्वागत समितीतूनही निधी उभारणी

गतवर्षापर्यंतच्या साहित्य संमेलनात ज्या स्वागत समितीमधील सदस्यत्वाचे मूल्य दोन हजार रुपये होते, त्यातदेखील यंदा अडीच पट वाढ करुन ते ५ हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे स्वागत समितीच्या माध्यमातून तसेच स्थानिक दानशूर आणि रसिकांच्या माध्यमातूनही निधी उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.