शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिठसागरे येथे आगीत अडीच लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

मिठसागरे-पुतळेवाडीदरम्यान विठ्ठल भाऊसाहेब चतुर यांच्या शेतात हा प्रकार घडला. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग ...

मिठसागरे-पुतळेवाडीदरम्यान विठ्ठल भाऊसाहेब चतुर यांच्या शेतात हा प्रकार घडला. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण करत बाजूलाच सोंगणी करून ठेवलेल्या तुरीला कवेत घेतले. परिसरातील शेतकऱ्यांनी व चतुर कुटुंबीयांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पूर्ण नुकसान झाल्यावरच आग शमली. या घटनेत शेतात साठविलेला सुमारे पाच ट्रॅक्टर मका व बाजरीचा चारा अंदाजे वीस पोती उत्पादन होणारे तुरीचे पीक बेचिराख झाले. यामुळे चतुर यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिक्षक नेते आनंदा कांदळकर यांच्यासह मिठसागरे परिसरातील शेतकऱ्यांनी चतुर यांच्या वस्तीकडे धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेबाबत कांदळकर यांनी तहसील व पांगरी येथील तलाठी कार्यालयात माहिती दिली. महसूल विभागाने चतुर यांच्या पीक नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

महावितरणच्या जुनाट तारा वारंवार अपघातांना निमंत्रण देत आहेत. बहुतांश ठिकाणी शेतांमधून गेलेल्या तारांमध्ये झोळ पडला असून त्या हलक्याशा हवेनेही एकमेकांना चिकटतात. त्यातून शॉटसर्किट होऊन ठिणग्या पडतात व शेतीपिकांचे नुकसान होते. महावितरणने तातडीने सर्वेक्षण करून जुनाट वीजतारा बदलाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने विजेचे खांब शेतामधून न नेता ते बांधावर बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

===Photopath===

040221\04nsk_12_04022021_13.jpg

===Caption===

मिठसागरे येथे चाऱ्याच्या गंजीला लागलेली आग.