शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोविडमुळे कोलमडले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 10:37 PM

कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.

ठळक मुद्दे खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ

कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, शेतीमालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे हाती आलेला शेतीमाल बेभावात विकावा लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा अनुभवत आहे. आताही कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच इतर फळे माल शेतातच सडला आहे.खरीप हंगाम अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, भरवीर बु., साकूर, पिंपळगाव, घोटी बु. परिसरात शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.एकीकडे शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आधीच मोडकळीस निघालेली शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खतांच्या दरवाढीमुळे पुरती कोलमडली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे ७ एप्रिलपासून खतांच्या किमतीत प्रतिबॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला मोठा फटका बसणार आहे.- सचिन सहाणे, शेतकरी, साकूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी