शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तातडीच्या ६३५ पदांच्या भरतीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

नाशिक : सध्याच्या परिस्थितीत कोरोनाबाबतचे काम करताना मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन राज्य शासनाने ६३५ कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता दिली आहे. ...

नाशिक : सध्याच्या परिस्थितीत कोरोनाबाबतचे काम करताना मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन राज्य शासनाने ६३५ कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता दिली आहे. केवळ वैद्यकीयच नव्हे तर अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी, लेखा व लेखा परीक्षण विभागातील ३७ संवर्गातील ही पदे आहेत. या संदर्भातील शासनाचे मान्यता पत्र मनपाला शुक्रवारी (दि. १६) प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाशी लढा देत असताना मनपाला मनुष्यबळ कमी पडत होते. त्यामुळे महापालिकेने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु, राज्य शासनाकडून नियमित पद भरतीला मान्यता मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली हेाती. तीन-तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती केली जात असली, तरी केवळ तीन महिन्यांसाठी जीव धोक्यात घालून काम करण्यास कोणीही तयार होत नव्हते. त्यामुळे मुलाखतीसाठी येवूनही नंतर उमेदवार रूजूच होत नव्हते.

मुळात महापालिकेचा आकृतीबंध शासनाकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून मंजुरीसाठी पडून आहे. त्यातील किमान वैद्यकीय आणि अग्निशमन दलासह अन्य महत्त्वाच्या विभागातील पदे भरण्यास मान्यता मिळावी, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी पाठपुरावा केला होता. अखेरीस या आकृतीबंधाच्या प्रस्तावातील बाबी विचारात घेऊन व आस्थापनेवर विविध संवर्गातील रिक्त झालेली पदे भरून काढण्यासाठी शासनाने महानगरपालिकेच्या गट - अ ते गट - ड मध्ये आवश्यक असलेल्या पदांचा विभागनिहाय आकृतीबंधातील आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, अभियांत्रिकी विभाग, लेखा व परीक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग या ५ विभागांतील ३७ संवर्गातील ६३५ पदांना शासनाने परवानगी दिल्याबाबतचा आदेश उपसचिव यांच्या स्वाक्षरीने पारित झाला असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. यामुळे मनपाकडे विविध कामे करण्यास मनुष्यबळ उपलब्ध होईल, असेही आयुक्त जाधव यांनी सांगितले.

इन्फो...

राज्य शासनाने कोरोनाच्या संकट काळात ६३५ पदे भरण्यास मान्यता दिल्याने महापालिकेच्या सर्वच संबंधित विभागांची मोठी अडचण दूर होणार आहे. अग्निशमन दलाची अवस्था तर अत्यंत बिकट होती, आपात काळात काम करणे कठीण होत होते. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.