शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब

By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST

नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला.

नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अटीतटीची निवडणूक झाल्याने खरोखरीच अंदाज बांधणे कठीण झाले होते. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला आव्हान दिले जाऊ शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता; परंतु मतमोजणीत पहिल्या फेरीत हेमंत गोडसे यांनी ७ हजार १०९ मतांची आघाडी घेतली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला. दुसर्‍या फेरीत आणखी सहा हजार मतांची आघाडी गोडसे यांनी घेतली. तथापि, गोडसे यांनी पन्नास हजारांचे मताधिक्य पार करेपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांना साशंकता होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील सुरुवातीला मिळालेले मताधिक्य अपेक्षित वाटत होते. सुरुवातीला ज्या मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली ते भाजपाला अनुकूल असल्याचे सांगितले जात होते. भुजबळ यांच्या सोयीच्या मतदान केंद्रांची मोजणी सुरू झाली म्हणजे मताधिक्यावर ते मात करतील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु तशी वेळ आली नाही. प्रत्येक फेरीगणिक गोडसे यांचे मताधिक्य वाढत गेले आणि कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला. मतमोजणीच्या ठिकाणी आणि केंद्राच्या बाहेरही प्रत्येक फेरीगणिक कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपातील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.एकीकडे ही अवस्था असताना, दुसरीकडे मात्र कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाना महाले, शहराध्यक्ष शरद कोशिरे, दिलीप खैरे, समाधान जाधव, विनायक खैरे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी विजयाची आशा सोडून दिली आणि मतदान केंद्र सोडले. सुनील बागुल आणि त्यांचे कायर्कर्ते विलंबाने बाहेर गेले. या सर्व धावपळीत मनसेचे आमदार वसंत गिते किंवा अन्य आमदार, पदाधिकारी कोणीही मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ते निकाल अगोदरच जाणून होते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. अन्य अनेक पक्षांचे पदाधिकारीदेखील मतदान केंद्रांकडे फिरकले नाहीत.