शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मुदतवाढ तर मिळाली, परंतु महापौराची कारकिर्द उजाळेल?

By संजय पाठक | Published: August 17, 2019 11:53 PM

संजय पाठक, नाशिक - अखेरीस महापौर रंजना भानसी यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीला अवघा महिना बाकी असताना त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ ...

ठळक मुद्देअडीच वर्षात जेमतेम कामगिरीआयुक्तांच्या संघर्षात गेले वर्षेमहत्वाचे सर्वच निर्णय अंमलबजावणीविना

संजय पाठक, नाशिक- अखेरीस महापौर रंजना भानसी यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीला अवघा महिना बाकी असताना त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे त्या नशिबवान ठरल्या खऱ्या परंतु उर्वरीत कालावधीचा लाभ घेऊन त्या नक्की काय करतात, यावर नाशिककरांचे नशिब कसे आहेत ते ठरू शकेल. कोणतीही कल्पक योजना नाही की नाविन्य नाही आहे तेच काम पुढे नेण्याचे कसब त्यांनी दाखवले खरे परंतु त्यातून भाजपाच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न निर्माण झाला. आता तीन महिने मिळाले आहेच, त्याचा त्या नाशिककरांसाठी काय फायदा करून देतात, त्यावर पक्षाच्या कामगिरीचे मुल्यमापन होणार आहे.

महापौरपदाचे आरक्षण अनुसूचीत जमातीसाठी मिळाल्याने पक्षातील ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर रंजना भानसी यांना संधी मिळाली. ती अपेक्षीत होती. परंतु कामगिरीसाठी मात्र आरक्षण किंवा अनारक्षण असे काहीही नसते. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांना अफाट संधी होती. अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने महापालिकेत ज्या पध्दतीचे कामकाज त्यांनी करणे अपेक्षीत होते त्याबाबत मात्र भ्रमनिरास झाला असेच म्हणावे लागेल.

नव्याचे नऊ दिवस म्हणून पहिले वर्ष सरले आणि दुसºया वर्षी तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचा कब्जा घेतला. त्या दिवसापासून आजपर्यंत महापौर सावरल्या नाहीत. आयुक्त परस्पर निर्णय घेतात असा दावा त्यांनी केला परंतु त्यांना सभागृहात निर्णय घेण्याचे आधिकार असूनही त्यात तरी असा कोणता धाडसी निर्णय घेतला. केवळ मुंढे यांच्याशी स्पर्धा करायची म्हणून त्यांनी महापौर आपल्या दारी उपक्रम राबविला गेला. दोन भेटीत दौरा संपलाच परंतु मुंढे गेल्यानंतर त्यावर महापौरांनी चर्चाही केल्या नाहीत. करवाढ या एका विषयावरून महापौरांनी मुंढे यांच्या विरोधात आपल्याकडे नाशिककरांना वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंढे यांच्या बदलीसाठी प्रतिष्ठापणाला लाऊन देखील महापौर हा प्रश्न सोडू शकल्या नाहीत. आयुक्त गमे यांनी मुंढे यांचाच निर्णय कायम ठेवल्याने महापौरांचा संघर्ष नाशिककरांसाठीच होता काय असा देखील प्रश्न पडतो.

महापौरांच्या याच कारकिर्दीत बेकदायदा धार्मिक स्थळे आणि तसेच महापालिकेने सेवाभावी मंडळांना दिलेल्या समाज मंदिर आणि अभ्यासिकांचा विषय ऐरणीवर आला परंतु त्यावर देखील कोणताही तोडगा त्या काढु शकल्या नाही. मार्च महिन्यात महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा झाली त्यात मुलींच्या जन्मावर मनपाकडून एफडी करण्याची अनोखी सुकन्या योजना त्यांनी जाहिर केली. वस्तुत: महापालिका सोडाच अनेक ग्रामपंचायतींनी देखील ही योजना राबविली आहे त्याची नक्कल करून देखील अद्याप योजना अमलातच आलेली नाही.

मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना जूनीच होती. बस सेवा ही महत्वांकांक्षी प्रकल्प म्हणावा की संकट हे नंतर कळणार असल्याने त्यावर महापौरांचे श्रेय की अपश्रेय हा विषय नंतरच ठरू शकेल. स्मार्ट सिटीच्या बाबतीत देखील हाच प्रकार आहे कंपनीचे कामकाज इतके वादग्रस्त ठरले आहे की स्मार्ट सिटी शाप की वरदान असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

एकुणच महापौरांच्या कारकिर्दीत त्या ठोस निर्णय घेऊ शकल्या नाहीत की त्यांना तसे करण्यासाठी भाजपाचे स्थानिक आमदार आणि अन्य पदाधिकारीही प्रवृत्त करू शकले नाहीत. त्यामुळे या साºयाचे अपयश केवळ महापौरांच्याच पदरी नाही तर महपालिकेत हस्तक्षेप करणारे आमदारही तितकेच जबाबदार असून महापौरांचा सोयीने वापर करून घेणारे नगरसेवक बंधूही तितकेच अपयशाचे धनी आहेत. आता तीन महिन्यांपैकी दोन महिने विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारासंहिते जाणार असून महिनाभरात धडकेबाज कामगिरी करण्याची महापौरांची तरी मानसिकता दिसत नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRanjana Bhansiरंजना भानसीBJPभाजपा