शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पंढरी संकटात, निर्यातक्षम मालाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:04 IST

जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

ठळक मुद्देथंडीमुळे द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढलेहवामान बदलामुळे द्राक्ष पंढरीवर संकटाचे ढग निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत

नाशिक : जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला  आहे. संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागा गेल्या महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे साखरभरणी काही प्रमाणात लांबली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वधारत असताना तापमानात कमालीची घट झाली असून पारा घसरल्याने द्राक्षमणी तडकल्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ज्या भागात तपमान ५ अंशाहून अधिक आहे, अशा परिसरातही थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी होण्याचा कालावधीही लांबला आहे. या परिस्थितीत वाढीला लागलेल्या द्राक्षबागांमधील मणी वाचविण्यासाठी शेतऱ्याकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून ऊब निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हवामान बदलामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

अशा परिस्थितीत कृषी तज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, औषध फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे व औषधे वापरण्यासोबतच फवारणीमुळे द्राक्षमण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही याची दक्षता घ्यावी, सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा, असा सल्लाही कृषितज्ज्ञाकडून दिला जात आहे. त्यामुळे द्राक्षबागा संकटात असताना शेतकरी मात्र समस्येवर मार्ग काढण्याच्या विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. द्राक्ष शेती मार्गदर्शकांच्या मतानुसार, द्राक्षबागांना हवामान बदलामुळे धोका संभवत असला तरी शेतकºयांनी अतिघातक औषधांचा अधिक वापर न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तापमानाचा पारा घसरला असला तरी सर्व क्षेत्रात तापमान सारखेच असते, असे नाही. त्यामुळे विहीर आणि खोलगट भागालगत अगदी नीचांकी सहा ते पाच अंशांपर्यंत तापमान असलेल्या भागातच शेतकºयांनी शेकोटी पेटवून बागांना ऊब देणे आवश्यक आहे. 

निर्यात घटण्याची शक्यता गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. परंतु, यावर्षी थंडीच्या कडाख्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकीकडे द्राक्ष बागा संकटात असताना शेतºयांना मात्र बागा साखर भरणीच्या काळात असल्याने अति तीव्रतेच्या औषधांचा वापर करता येत दुसरीकडे द्राक्षमणी फू टल्याने बागांचे नूकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.   

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीweatherहवामान