शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पंढरी संकटात, निर्यातक्षम मालाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:04 IST

जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

ठळक मुद्देथंडीमुळे द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढलेहवामान बदलामुळे द्राक्ष पंढरीवर संकटाचे ढग निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत

नाशिक : जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला  आहे. संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागा गेल्या महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे साखरभरणी काही प्रमाणात लांबली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वधारत असताना तापमानात कमालीची घट झाली असून पारा घसरल्याने द्राक्षमणी तडकल्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ज्या भागात तपमान ५ अंशाहून अधिक आहे, अशा परिसरातही थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी होण्याचा कालावधीही लांबला आहे. या परिस्थितीत वाढीला लागलेल्या द्राक्षबागांमधील मणी वाचविण्यासाठी शेतऱ्याकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून ऊब निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हवामान बदलामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

अशा परिस्थितीत कृषी तज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, औषध फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे व औषधे वापरण्यासोबतच फवारणीमुळे द्राक्षमण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही याची दक्षता घ्यावी, सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा, असा सल्लाही कृषितज्ज्ञाकडून दिला जात आहे. त्यामुळे द्राक्षबागा संकटात असताना शेतकरी मात्र समस्येवर मार्ग काढण्याच्या विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. द्राक्ष शेती मार्गदर्शकांच्या मतानुसार, द्राक्षबागांना हवामान बदलामुळे धोका संभवत असला तरी शेतकºयांनी अतिघातक औषधांचा अधिक वापर न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तापमानाचा पारा घसरला असला तरी सर्व क्षेत्रात तापमान सारखेच असते, असे नाही. त्यामुळे विहीर आणि खोलगट भागालगत अगदी नीचांकी सहा ते पाच अंशांपर्यंत तापमान असलेल्या भागातच शेतकºयांनी शेकोटी पेटवून बागांना ऊब देणे आवश्यक आहे. 

निर्यात घटण्याची शक्यता गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. परंतु, यावर्षी थंडीच्या कडाख्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकीकडे द्राक्ष बागा संकटात असताना शेतºयांना मात्र बागा साखर भरणीच्या काळात असल्याने अति तीव्रतेच्या औषधांचा वापर करता येत दुसरीकडे द्राक्षमणी फू टल्याने बागांचे नूकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.   

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीweatherहवामान