शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:03 PM

काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे.

ठळक मुद्दे घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकीसत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हतासरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका, भाजपाचं शिवसेनेला आवाहन

नाशिक - नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशहिताचे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी हे देशहितासाठी विधेयक स्वीकारावं, हे विधेयक देशासाठी आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये, सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं लोकसभेत समर्थन केले अन् राज्यसभेत पळून गेले, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार आहे त्यामुळे राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करू नये. देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर आमचा पराभव झाला आहे. या 12 जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पराभव नेमका का झाला याचा अहवाल सादर करणार आहे. काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचा टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला. 

दरम्यान, शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला आवाहन करत तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही. मात्र शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा असं त्यांनी सांगितले होते. फडणवीसांच्या या विधानावर दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक