शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कालवा परिसरातील २५ गावांची वीज खंडित

By admin | Updated: April 30, 2017 01:41 IST

नाशिक : येवला, मनमाड शहरासह पाणीपुरवठा योजनांना पालखेड धरणातून रविवारी सायंकाळी पाणी सोडण्यात येणार आहे.

नाशिक : येवला, मनमाड शहरासह पाणीपुरवठा योजनांना पालखेड धरणातून रविवारी सायंकाळी पाणी सोडण्यात येणार असून, साधारणत: दहा दिवस डाव्या कालव्याच्या मार्गे झेपावणाऱ्या या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कालव्याच्या दुतर्फा गावातील वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच, कालव्यात चोरून डोंगळे टाकण्यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखेड धरणातून शेवटचे ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय दहा दिवसांपूर्वीच घेण्यात येऊन २५ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्यासाठी कालव्यात टाकण्यात आलेले डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुमारे दीड हजारांच्या आसपास डोंगळे काढण्यात आल्यानंतर रविवारी सायंकाळी पालखेडमधून पाणी सोडण्यास पाटबंधारे खाते राजी झाले आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून, कालव्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे २५ गावांमध्ये या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. धरणातून सोडलेले पाणी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी साधारणत: ६० तासांचा कालावधी लागणार असून, साधारणत: दहा दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)