शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

६७ वर्षांनंतर हिरे कुटुंबीयांविना लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:21 IST

सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.

ठळक मुद्देसलग ४७ वर्षे मंत्रिपद घरात : मालेगाव बाह्यऐवजी यंदा मतदारसंघ बदलून उमेदवारी

नाशिक : सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.राजकारण व सत्ताकारणात मालेगाव तालुक्याची व पर्यायाने नाशिक जिल्ह्याची ओळख मुळातच कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान व त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाऊसाहेबांनी कॉँग्रेस चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९५२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊसाहेब पहिल्यांदा नांदगाव मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांचा नांदगाव मतदारसंघात समावेश होता. मालेगाव व दाभाडी हे दोन्ही मतदारसंघ अस्तित्वात नव्हते. १९५२ मध्ये भाऊसाहेब निवडून आले. त्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणुकीत बाजी मारली. १९६२ मध्ये भाऊसाहेब यांचे पुत्र व्यंकटराव हिरे यांनी नांदगावमधून उमेदवारी केली. ते पहिल्या निवडणुकीत विजयी झाले.१९९९ मध्ये पुत्र प्रशांत हिरे हे एकदा येथून निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दादा भुसे यांची लढत प्रशांत हिरे यांच्याशी झाली. त्यावेळी भाजपकडून स्व. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांना उमेदवारी दिली गेली; परंतु या निवडणुकीत दोन्ही हिरेंचा पराभव झाला व तेथून या मतदारसंघावरील हिरे कुटुंबीयांची पकड ढिली पडली. २००४ पासून ते २०१९ पर्यंत दादा भुसे यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला असला तरी, २००९ मध्ये पुन्हा प्रशांत हिरे यांनी उमेदवारी करून हिरे कुटुंबीयांवर विश्वास ठेवून असलेल्या मतदारांसमोर पर्याय उभा केला. त्यानंतर २०१४ मध्ये प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी स्व. भाऊसाहेब हिरे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नांदगाव मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा पराभव झाला. यंदा मात्र २०१९ च्या निवडणुकीत म्हणजे तब्बल ६७ वर्षांनंतर मालेगाव बाह्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघातून हिरे कुटुंबातील कुणीही उमेदवारी करीत नाही; परंतु ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात हिरे कुटुंबातील चौथी पिढी प्रचारात उतरलेली दिसत आहे, तर डॉ. अपूर्व हिरे राष्टÑवादीकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत.आणीबाणीनंतरच्या काळातही दाभाडीचा गड हिरेंकडेच११९६७ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर मालेगाव, नांदगाव तालुक्यातील काही गावे मिळून दाभाडी मतदारसंघाची निर्मिती झाली. १९६७ मध्ये व्यंकटराव हिरेंनी दाभाडीतून निवडणूक लढविली. त्यानंतर १९७२ मध्ये डॉ. बळीराम हिरे यांच्या रूपाने दुसºया पिढीकडे या मतदारसंघाची सूत्रे गेली. २स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणीबाणीनंतरच्या काळात १९७८ मध्ये देशात सर्वत्र कॉँग्रेसचा पराभव झालेला असताना दाभाडीचा गड डॉ. बळीराम हिरे यांनी कायम राखला. १९८० मध्ये पुन्हा निवडणुका झाल्यावर डॉ. हिरे निवडून आले.३ १९८५ मध्ये राज्यात पुलोदचा प्रयोग शरद पवार यांनी केला असता, दाभाडी मतदारसंघात स्व. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या स्नुषा पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांनी भारतीय कॉँग्रेस (स) या पक्षाकडून उमेदवारी केली व त्यांनी त्यात डॉ. बळीराम हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर सातत्याने १९९०, ९५ च्या निवडणुकीत पुष्पाताई हिरेंनी दाभाडीचा गड कायम राखला.हिरे कुटुंबीयांनी केले पक्षांतरसलग ४७ वर्षे मंत्रिपद ताब्यात ठेवणारे हिरे कुटुंबीय मूळचे कॉँग्रेसी विचारसरणीचे असले तरी, १९९९ मध्ये या कुटुंबाने पहिल्यांदा राजकीय घरोबा बदलला. प्रशांत हिरे यांनी सेनेत प्रवेश करून मंत्रिपदही मिळविले तर २००४ मध्ये प्रसाद हिरे यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर प्रशांत हिरे पुन्हा राष्टÑवादीत सामील झाले. २०१४ मध्ये प्रशांत हिरे यांच्या पुत्रांनी भाजपत प्रवेश केला. २०१८ मध्ये पुन्हा सर्व हिरे कुटुंबीय स्वगृही म्हणजे कॉँग्रेस विचारधारेकडे वळाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019malegaon-outer-acमालेगाव बाह्य