शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

जिल्ह्यातील ४० टक्के द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत ...

ठळक मुद्देपाऊस, थंडीचा फटका : मण्यांच्या फुगवणीवर परिणाम

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत असलेल्या अतिथंडीमुळेही द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातक्षम असलेल्या रंगीत द्राक्षांना युरोपात सध्या चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, तर राज्यात साडेतीन लाख एकर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसामुळे सटाणा भागातील अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा द्राक्षनिर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मागील वर्षी आतापर्यंत १४०० कंटेनर माल परदेशात गेला होता. यावर्षी मात्र आतापर्यंत १०५०-१०७० कंटेनरच गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचा द्राक्ष उत्पादनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, ज्या बागांपासून ६ ते १० टनापर्यंत उत्पादन मिळते त्याच द्राक्षबागांपासून आज केवळ २ ते ३ टन माल निघत आहे. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. युरोपात पाठविल्या जाणाºया पांढºया द्राक्षांना ८५ ते ९५ रुपये किलो, तर रंगीत द्राक्षांना १०५ ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र शेतकºयांकडे हा मालच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची संख्याही पाच ते सहा हजाराने कमी झाली असून, यावर्षी फक्त ३१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे, असे ते म्हणाले.सध्या पडत असलेल्या थंडीचाही द्राक्षांवर परिणाम होत असून, थंडीमुळे क्रॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक असून, त्या तुलनेत सांगली, सोलापूर भागात नुकसान कमी आहे. त्या भागात छाटणी उशिरा होत असल्याने तेथील बागांना तसा फारसा धोका झाला नाही, अशी माहिती भोसले यांनी दिली.शेतकरी झाले सतर्कबदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. फवारणीचे प्रमाण वाढले तरी द्राक्षांमध्ये केमिकलचे प्रमाण काहीच जाणवत नाही. यावरून द्राक्ष उत्पादक शेतकरी किती सतर्क झाले आहेत याची प्रचिती येते, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस