शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० टक्के द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत ...

ठळक मुद्देपाऊस, थंडीचा फटका : मण्यांच्या फुगवणीवर परिणाम

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत असलेल्या अतिथंडीमुळेही द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातक्षम असलेल्या रंगीत द्राक्षांना युरोपात सध्या चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, तर राज्यात साडेतीन लाख एकर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसामुळे सटाणा भागातील अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा द्राक्षनिर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मागील वर्षी आतापर्यंत १४०० कंटेनर माल परदेशात गेला होता. यावर्षी मात्र आतापर्यंत १०५०-१०७० कंटेनरच गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचा द्राक्ष उत्पादनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, ज्या बागांपासून ६ ते १० टनापर्यंत उत्पादन मिळते त्याच द्राक्षबागांपासून आज केवळ २ ते ३ टन माल निघत आहे. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. युरोपात पाठविल्या जाणाºया पांढºया द्राक्षांना ८५ ते ९५ रुपये किलो, तर रंगीत द्राक्षांना १०५ ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र शेतकºयांकडे हा मालच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची संख्याही पाच ते सहा हजाराने कमी झाली असून, यावर्षी फक्त ३१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे, असे ते म्हणाले.सध्या पडत असलेल्या थंडीचाही द्राक्षांवर परिणाम होत असून, थंडीमुळे क्रॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक असून, त्या तुलनेत सांगली, सोलापूर भागात नुकसान कमी आहे. त्या भागात छाटणी उशिरा होत असल्याने तेथील बागांना तसा फारसा धोका झाला नाही, अशी माहिती भोसले यांनी दिली.शेतकरी झाले सतर्कबदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. फवारणीचे प्रमाण वाढले तरी द्राक्षांमध्ये केमिकलचे प्रमाण काहीच जाणवत नाही. यावरून द्राक्ष उत्पादक शेतकरी किती सतर्क झाले आहेत याची प्रचिती येते, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस