शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

जिल्ह्यातील ४० टक्के द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत ...

ठळक मुद्देपाऊस, थंडीचा फटका : मण्यांच्या फुगवणीवर परिणाम

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत असलेल्या अतिथंडीमुळेही द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातक्षम असलेल्या रंगीत द्राक्षांना युरोपात सध्या चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, तर राज्यात साडेतीन लाख एकर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसामुळे सटाणा भागातील अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा द्राक्षनिर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मागील वर्षी आतापर्यंत १४०० कंटेनर माल परदेशात गेला होता. यावर्षी मात्र आतापर्यंत १०५०-१०७० कंटेनरच गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचा द्राक्ष उत्पादनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, ज्या बागांपासून ६ ते १० टनापर्यंत उत्पादन मिळते त्याच द्राक्षबागांपासून आज केवळ २ ते ३ टन माल निघत आहे. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. युरोपात पाठविल्या जाणाºया पांढºया द्राक्षांना ८५ ते ९५ रुपये किलो, तर रंगीत द्राक्षांना १०५ ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र शेतकºयांकडे हा मालच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची संख्याही पाच ते सहा हजाराने कमी झाली असून, यावर्षी फक्त ३१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे, असे ते म्हणाले.सध्या पडत असलेल्या थंडीचाही द्राक्षांवर परिणाम होत असून, थंडीमुळे क्रॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक असून, त्या तुलनेत सांगली, सोलापूर भागात नुकसान कमी आहे. त्या भागात छाटणी उशिरा होत असल्याने तेथील बागांना तसा फारसा धोका झाला नाही, अशी माहिती भोसले यांनी दिली.शेतकरी झाले सतर्कबदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. फवारणीचे प्रमाण वाढले तरी द्राक्षांमध्ये केमिकलचे प्रमाण काहीच जाणवत नाही. यावरून द्राक्ष उत्पादक शेतकरी किती सतर्क झाले आहेत याची प्रचिती येते, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस