शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

टवाळखोरी करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देकारवाई : पोलिसांकडून आठवडाभरात पुन्हा मोहीम

नाशिक : जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.शहर पोलिसांनी अंबड, आडगाव, मुंबई नाका, भद्रकाली व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत संशयितांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अंबडमधील प्रकाश बापू कांबळे (२७), प्रकाश देवराम खवळे (२८), संभाजी गजमल पाटील (४०), सुनील नागराज पाटील (४२) यांना मटालेनगरमध्ये असलेल्या जय मल्हार पान स्टॉलजवळ एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करताना अटक करून जामिनावर सोडून दिले, तर दुसºया घटनेत पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनोद दिलीप पिठे (२५), रमेश मधुकर जाधव, रवींद्र नाना जाधव, संजय काळू पवार या ३८ वर्षीय तिघांसह राम किसन गांगुर्डे (३५) आदींना दुपारी सव्वातीन वाजता तपोवनातील बटुक हनुमान मंदिराजवळ एकत्रितपणे अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारका सर्कलसमोरील एनडीसीसी बँकेच्या समोर असलेल्या सर्व्हिसरोडवर झालेल्या कारवाईत करण सुरेश साळवे (१९), गोपी भिवा आचारी (२३) वकार साजिद शेख (२४) मेहुल विनोद आगले (२७), मोदीन अन्सार शेख (३६) यांना रात्री १० वाजताच्या सुमारास गोंधळ घालताना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल के ला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आसिफ बशीर मेमन (४२), अनिलसिंग नायक (२७), तेजस विजय गायकवाड (२३) नितीन तुकाराम नाठे (२२) व अक्षय विजय राठोड (१९) या संशयितांना भद्रकालीतील तलावडी येथे सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.भद्रकालीतील तलावडीतच दुसºया घटनेत रात्री पावणेनऊ वाजता ओमकार कृष्ण गायकवाड (२६), कमर अन्वर शेख (३२), सुशील सुधाकर यशवंते (३०), अजय गांधी बागमार (२१), राजिंद्र त्रिभुवन यादव (३६) व रंजित अशोक भिसे (५४) यांना सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग व पोलीस आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हेगारांवर जरब बसणारबुधवारी दिवसभर केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी पोलिसांची कारवाई निश्चिच फायदेशीर ठरेल, असे मत नाशिककरांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी