शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

टवाळखोरी करणाऱ्या २५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देकारवाई : पोलिसांकडून आठवडाभरात पुन्हा मोहीम

नाशिक : जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.शहर पोलिसांनी अंबड, आडगाव, मुंबई नाका, भद्रकाली व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत संशयितांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अंबडमधील प्रकाश बापू कांबळे (२७), प्रकाश देवराम खवळे (२८), संभाजी गजमल पाटील (४०), सुनील नागराज पाटील (४२) यांना मटालेनगरमध्ये असलेल्या जय मल्हार पान स्टॉलजवळ एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करताना अटक करून जामिनावर सोडून दिले, तर दुसºया घटनेत पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनोद दिलीप पिठे (२५), रमेश मधुकर जाधव, रवींद्र नाना जाधव, संजय काळू पवार या ३८ वर्षीय तिघांसह राम किसन गांगुर्डे (३५) आदींना दुपारी सव्वातीन वाजता तपोवनातील बटुक हनुमान मंदिराजवळ एकत्रितपणे अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारका सर्कलसमोरील एनडीसीसी बँकेच्या समोर असलेल्या सर्व्हिसरोडवर झालेल्या कारवाईत करण सुरेश साळवे (१९), गोपी भिवा आचारी (२३) वकार साजिद शेख (२४) मेहुल विनोद आगले (२७), मोदीन अन्सार शेख (३६) यांना रात्री १० वाजताच्या सुमारास गोंधळ घालताना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल के ला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आसिफ बशीर मेमन (४२), अनिलसिंग नायक (२७), तेजस विजय गायकवाड (२३) नितीन तुकाराम नाठे (२२) व अक्षय विजय राठोड (१९) या संशयितांना भद्रकालीतील तलावडी येथे सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.भद्रकालीतील तलावडीतच दुसºया घटनेत रात्री पावणेनऊ वाजता ओमकार कृष्ण गायकवाड (२६), कमर अन्वर शेख (३२), सुशील सुधाकर यशवंते (३०), अजय गांधी बागमार (२१), राजिंद्र त्रिभुवन यादव (३६) व रंजित अशोक भिसे (५४) यांना सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग व पोलीस आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हेगारांवर जरब बसणारबुधवारी दिवसभर केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींना जामिनावर सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी पोलिसांची कारवाई निश्चिच फायदेशीर ठरेल, असे मत नाशिककरांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी