शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

कोरोनामुळे वाटा बंद : आता डोळ्यांपुढे काजवे चमकणार नाहीत !

By अझहर शेख | Published: May 28, 2020 4:47 PM

पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल पर्यटनाच्या हंगामावर पाणीकोरोना या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद

नाशिक : कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मेअखेर काजव्यांची चमचम पहावयास मिळते. वळव्याच्या पावसानंतर येथील वृक्षराजीवर जणु तारकादळे लखलखते; मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली काजवा महोत्सव सापडला आहे. रोजगार बुडाला तर चालेल; मात्र काजवा महोत्सवाद्वारे कोरोनाला निमंत्रण द्यायचे नाही, असा कठोर निर्णयच या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या गावकऱ्यांनी ठरावाद्वारे घेतला. नाशिक वन्यजीव विभागानेदेखील मागील दोन महिन्यांपासून अभयारण्याची वाट पर्यटकांसाठी बेमुदत कालावधीसाठी बंद केली आहे.नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी काजवा महोत्सव पार पडणार नसल्याचे नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे. पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्याकरिता नाशिक वनवृत्तासह राज्यभरातील अभयारण्य, राखीव वने प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये दोन महिन्यांपासून बेमुदत बंद ठेवण्यात येत आहेत.

दरवर्षी मे अखेरीस कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील अर्जुनसादडा, उंबर, जांभूळ, बेहडा, हिरडा, सादडा यांसारख्या वृक्षराजीवर काजव्यांची चमचम अनुभवयास येते. मान्सूनच्या सरीं कोसळेपर्यंत काजवे या भागात लुकलुकतात. रात्रीच्याअंधारात जणू धरतीवर प्रकाशफुलेच अवतरली की काय असा भास होतो. खरं तर हा कालावधी जैवविविधतेतील काजवा या किटकाचा प्रजननाचा असतो.दरवर्षी महिनभर निसर्गाचा हा अद्भूत व डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा बघण्यासाठी नाशिक, अहमदनगर या जवळ्या जिल्ह्यांसह मुंबई, पुणे या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, भावनगर या भागातूनही पर्यटक येथे हजेरी लावतात. यावर्षी या नाशिक वन्यजीव विभागाला मिळणाºया महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. या भागातील विविध आदिवासी गाव, पाड्यांवरील सुमारे ३५० कुटुंबियांचा रोजगारही बुडणार आहे. निवास-न्याहारी, गाईड, जंगल भ्रमंती आदिंच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दर दिवसाला या महोत्सवात किमान १ हजार तर कमाल ५ हजार रुपये मिळत होते.
साडेतीनशे आदिवासी कुटुंबाचा रोजगार बुडाला
अभयारण्य क्षेत्रातील गावांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोरोनामुळे आहे. येथील आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुसरा आधार म्हणजे पर्यटन. मात्र यावर्षी कोरोना या जीवघेण्या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद झाले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे.
मागील वर्षी सुमारे ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल नाशिक वन्यजीव विभागाला काजवा महोत्सवाच्या माध्यमातून मिळाला होता. २०१८ सालापासून पर्यटकांकडून शुल्क आकारणी वन्यजीव विभाग करत आहे. गेल्या वर्षी २०१८च्या महोत्सवाच्या तुलनेत दहा हजाराने पर्यटक वाढले होते. यावर्षी कोरोनामुळे अभयारण्य मागील दोन महिन्यांपासून बंदच असून पुढील आदेश अद्याप प्राप्त नाही. काजवा महोत्सवदेखील वरिष्ठांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.- दत्तात्रय पडवळे, वनक्षेत्रपाल, भंडारदरा

 

पर्यटनाच्या हंगामावर पाणीउन्हाळ्यात संध्याकाळनंतर भंडारदरा धरणाच्या काठालगत कॅम्पेनिंग, पावसाळ्याच्या तोंडावर काजवा महोत्सव आणि नंतर पावसाळी पर्यटन असा हा हंगाम असतो. या नऊ दे दहा महिन्यांत येथील आदिवासी तरुणांना चांगली कमाई होते; मात्र यंदा सगळा हंगाम संकटात सापडला आहे. साधारणत: सरासरी तीनशे ते साडेतीनशे कुटुंबांना यावर्षी मोठा आर्थिक फटका बसणार आहे. - केशव खाडे, स्थानिक गाइड

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव