शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कळवणला ग्राहकांची गर्दी; प्रशासनाकडून बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:15 IST

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्र वार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंतर ठेवल्याचे दिसून न आल्याने पोलीस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाददेखील द्यावा लागला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा सज्जड दम दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मेनरोडसह बसस्थानक, महाराजा चौकात शुकशुकाट झाला.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : मेनरोडवर शुकशुकाट

कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्र वार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंतर ठेवल्याचे दिसून न आल्याने पोलीस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाददेखील द्यावा लागला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा सज्जड दम दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मेनरोडसह बसस्थानक, महाराजा चौकात शुकशुकाट झाला.सध्या राज्यासह देशात, गावागावांत कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाउन असूनदेखील कळवण नगरपंचायतीने नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मेनरोड, बसस्थानक परिसर, महाराजा चौकात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नागरिकांनी भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी शुक्र वार, शनिवार व रविवारी मोठी गर्दी केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाउन पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची या तीन दिवसात पायमल्ली झाल्याचे दिसून आले. नागरिकांच्या तसेच भाजीबाजार विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाही. सॅनिटायझरचाही वापर कुठेही दिसून आला नाही. शहरातील बाजार मंडईमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून भाजी बाजाराचे नियोजन करण्यात आले होते, मात्र कळवणकर जनतेने भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्याने प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील वाढती गर्दी भाजी बाजारात होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्वरित गर्दीला हाकलून लावले तसेच भाजी बाजार बंद केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या किराणा दुकानदार, भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुळीच जाऊ नका आणि घरच्यांनाही कोणाला जाऊ देऊ नका, भाजीविक्रेता हा आपल्या गल्लीत येईल तेव्हा भाजी घ्यावी, त्याचीही स्वच्छता लक्षात घ्यावी, घरात राहा, नियम पाळा, स्वत:ची काळजी घ्या आणि कोरोना या संसर्गजन्य आजाराला पळवून लावा.- प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक कळवण

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार