शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणपोया तहानल्या

By admin | Updated: March 29, 2017 23:47 IST

नाशिक : मागील वर्षी दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे शहरातील विविध चौकाचौकांमध्ये उभारलेल्या पाणपोया सुरू करण्याचा महापालिका किंवा संबंधित संस्थांना मुहूर्त लागला नाही

नाशिक : एक दशकानंतर शहराचे मार्च महिन्यात कमाल तपमान चाळिशी पार गेले असून, नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसत आहे. मागील वर्षी दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे शहरातील विविध चौकाचौकांमध्ये उभारलेल्या पाणपोया सुरू करण्याचा महापालिका किंवा संबंधित संस्थांना मुहूर्त लागला नाही; मात्र यंदा दुष्काळी स्थिती नसतानाही भर उन्हाळ्यात या पाणपोया तहानलेल्याच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तब्बल दोन तपापूर्वी शहरातील चौकाचौकांत महापालिका प्रशासनाने पाणपोया बांधल्या आहेत. या पाणपोया सुरळीतपणे कार्यान्वित नसल्याचे सध्या चित्र आहे. विविध ठिकाणी नजरेस पडणाऱ्या गोलाकार पाणपोया केवळ शोभेपुरत्या राहिल्या आहेत. या पाणपोयांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. पडझड, नळांची दुर्दशा, पाण्याचा तुटवडा अशा एका ना अनेक समस्यांनी पाणपोया ग्रस्त झाल्या आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये असलेल्या पाणपोयांचा वापर बहुतांश जाहिरातदारांकडून स्वत:च्या व्यवसायाच्या जाहिराती लावण्यासाठी केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे या पाणपोया नेमक्या कशासाठी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने पाणपोई सुरू करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. शहरातील एकही पाणपोई सुस्थितीत नसून महापालिकेकडून यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.उन्हाची तीव्रता अधिक वाढणारयावर्षी उन्हाळा अधिक कडक असून, मार्च महिन्यातच पारा चाळिशीपार गेला आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेच्या विचाराने नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता एप्रिलपासून अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याक डून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शहरातील धूळखात पडलेल्या पाणपोया सुरू करण्याची गरज आहे. मोजक्याच ठिकाणी पाणपोईचे पाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील हॉटेलची वाट धरावी लागते किंवा पैसे मोजून पॅकबंद पाण्याची बाटली घ्यावी लागते. शहरात काही खासगी संस्थांकडून पिण्याचे पाणी नागरिकांना पाणपोईद्वारे उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. वकीलवाडीमधील काही व्यावसायिकांनी एकत्र येत कडुलिंबाच्या झाडाखाली ‘रांजण पाणपोई’ उभारली आहे. त्याचप्रमाणे मेळा बसस्थानकातदेखील पाणपोई सुरू करण्यात आली आहे. महामार्ग बसस्थानकात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे.महापालिकेने जपावे सामाजिक भानएक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील धूळखात पडलेल्या पाणपोया पुन्हा सुरू कराव्या. पाणपोयांची डागडुजी व रंगरंगोटी व नळजोडणी करून पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. उन्हाच्या झळा असह्य होत असताना जिवाची लाही लाही होत असून ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला यांना शहरातील रस्त्यांवर एकाही पाणपोईचा दिलासा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सामाजिक संस्थांची उदासीनता एरवी उन्हाळ्यामध्ये शहरासह विविध उपनगरांमध्ये विविध सामाजिक संस्था तसेच मित्रमंडळांकडून पांथस्थांच्या सेवेसाठी मुख्य चौकामध्ये व वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या सावलीत पाणपोई उभारली जात होती; मात्र अद्याप शहरासह उपनगरांमध्येही पाणपोयांची संख्या कमीच आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढूनदेखील अद्याप पाणपोईची संख्या अल्पच आहे. सामाजिक संस्था व मित्रमंडळांनी उदासीनता सोडून सामाजिक बांधिलकी म्हणून पाणपोई उभारण्यावर भर देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.