शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

By admin | Updated: November 16, 2016 00:48 IST

नागरिकांची नव्या नोटांसाठी धावाधाव

विंचूर : नोटा रद्दच्या निर्णयाने गोरगरीब जनतेबरोबरच मध्यमवर्गीय जनतेचे गेल्या आठ दिवसांपासून हाल सुरू आहेत. काबाडकष्ट करून जमवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली आहे. कामधंदा सोडून गेल्या काही दिवसांपासून बॅँकांच्या रांगेत लोकांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बँकांसमोर लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची पैशासाठी अडवणूक होऊ नये यासाठी रविवारीदेखील बँका सुरू होत्या. यामध्ये बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. सोमवारी गुरू नानक जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बॅँका बंद होत्या. मंगळवारी सकाळपासूनच बँकांसमोर पुन्हा तोबा गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.  सुट्या पैशांअभावी दुकानदारांकडून दोन हजाराची नोट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्र ार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुकानात गेल्यावर ग्राहक माल खरेदी केल्यानंतर दोन हजाराची नोट देतात. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकाला एवढे सुटे पैसे कोठून आणायचे, असा रास्त सवाल दुकानदार करतानाचे चित्र आहे. दोन हजार रु पयांची नोट चलनात आणली असली तरीही नागरिकांना दिलासा मिळाला नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी ५०० रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात चलनात आणणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रि या व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत. खात्यातून पैसे काढण्याची तसेच नोटा बदलून देण्याची मर्यादा वाढविल्याने जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे. ग्राहकाने पाचशे व हजाराच्या नोटा दिल्यास नोटेवर ग्राहकाच्या सह्या घेण्याचा फंडा एका गॅस एजन्सीने अवलंबिला आहे.  जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या असल्या तरी 30 डिसेंबरपर्यंत त्या बँकांत स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र नोटा बंद झाल्याच्या निर्णयानंतर बहुतांशी दुकानदार जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत. वास्तविक ग्राहकांकडून नोटा स्वीकारून दुकानदार त्या नोटा बॅँकेत आपल्या खात्यात जमा करू शकतात. मात्र अनेक दुकानदारांकडून नोटा स्वीकारल्या जात नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे तर बँकेत दोन दोन तास उभे राहूनही नंबर लागत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पाचशे हजारच्या नोटा बॅँकेत जमा करण्याची डिसेंबरच्या अखेरपर्यंत मुदत असूनही लोकांनी बॅँकेत एकाचवेळी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.