शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी तपमान बदलाने नागरिक हैराण

By admin | Updated: August 23, 2015 22:23 IST

मालेगावी तपमान बदलाने नागरिक हैराण

मालेगाव : शहर व परिसरात रोज होणाऱ्या तपमानातील बदलाने नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातून गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस हद्दपार झाला आहे. आॅगस्टच्या सुरुवातीला रिमझिम पडणारा पाऊस अद्याप न परतल्याने नागरिकांपुढे आगामी काळात कसे जगावे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात दिवसभरात तपमान एकसारखे राहत नाही. त्यात अनेक चढउतार होत आहेत. यात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडते. काहीवेळा जोरात वारे वाहू लागतात तर पुढच्या काही वेळात हवाही वाहत नाही. त्यामुळे गरम होते. या तपमानातील बदलाने नागरिकांच्या जिवाची तगमग वाढली आहे. नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या तपमानाचा सर्वात मोठा परिणाम लहान मुले व वयोवृध्द नागरिकांवर होत आहे. यामुळे थंडी वाजणे, अंगात कापरे भरणे, खोकला, सर्दी आदि आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यात डासांचे व लहान चिलट्यांचे साम्राज्य पसरले आहे. यावर उपाय योजण्याचे काम महानगरपालिकेचे आहे; मात्र त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे बोलले जाते. कॅम्प भागात असलेल्या अनेक वसाहतींमध्ये अनेक महिन्यांपासून औषध फवारणी करण्यात आलेली नाही. याविषयी लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही तर नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही. (प्रतिनिधी)