शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
4
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
5
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
6
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
7
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
8
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
9
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
10
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
11
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
12
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
13
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
14
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
15
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
16
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
17
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
18
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
19
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
20
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Daily Top 2Weekly Top 5

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

By admin | Updated: July 19, 2014 00:57 IST

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या गुणपडताळणीनंतर तब्बल ९४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला आहे. या बदलामुळे या मुलांच्या एकूण गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना जर आपल्या गुणांच्या बाबतीत आणि उत्तरपत्रिकांच्या संदर्भात शंका असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळते, त्या आधारे ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करू शकतात. याच लाभ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. इयत्ता बारावीतील गुणांची पडताळणी करून मिळावी, असे एकूण ७६८ इतके अर्ज प्राप्त झाले होते. तर सुमारे ८९० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रत मिळावी, अशी मागणी केली होती. १५५ विद्यार्थ्यांनी गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याचीही मागणी केली होती. या प्रक्रियेतून बारावीच्या ९४ विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला असून, त्यांच्या गुणांत बदल झाला आहे. अशाच प्रकारे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. मात्र दहावीत अद्याप तरी अर्ज दाखल केलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणात बदल झालेला नाही. दहावीतील ११३ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणी करून मिळावी यासाठी अर्ज केला आहे, तर ४४८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी केली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अत्यल्प २४ इतके अर्ज दाखल झाले होते. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)