शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

विकासकामांच्या स्थगितीमुळे कोट्यवधींच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 7:08 PM

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणार नाही,

ठळक मुद्देमनपा, जि.प. : शासनाकडे निधी परत पाठविण्याची तयारी १६ कामांचा नऊ कोटी रुपयांचा निधी पालिकेच्या तिजोरीत पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने यापूर्वीच्या सरकारने मंजूर केलेल्या विकासकामे व योजनांचा आढावा घेतानाच ज्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही अशी कामे स्थगित करून त्यासाठीचा निधी परत मागविल्याने नाशिक महापालिका व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या शेकडो कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यातील अनेक कामांचा लोकप्रतिनिधींनीच पाठपुरावा करून त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता, त्यांनादेखील धक्का बसला आहे.

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणार नाही, असा खुलासा केला मात्र त्याच दिवशी विशेष पत्राद्वारे नगरविकास व ग्रामविकास विभागामार्फत केल्या जाणाºया कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांना पाठविले आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने महापालिकेकडून शासकीय निधीतून केल्या जाणाºया कामांची माहिती मागविली आहे. या आदेशानुसार नाशिक महापालिकेने उद्यान विभागातील १६ कामांची माहिती शासनाला सादर करण्यात आली असून, महापालिकेकडे या कामांचा नऊ कोटींचा निधी पडून आहे. नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा तसेच विविध विकासकामांकरिता विविध योजनेअंतर्गत विशेष अनुदान दिले जाते. नाशिक महापालिकेलाही दरवर्षी शासनाकडून पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिस्सारण तसेच उद्यान विभागास अनुदान प्राप्त होत असते. अशा स्वरूपाचे महापालिकेच्या उद्यान विभागातील २४ कामांना २०१९-२० या वर्षासाठी विशेष अनुदान प्राप्त झाले होते. यात नाशिकरोड आणि पंचवटी विभागातील उद्यानांच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. २४ कामांपैकी १६ ते १७ कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे सादर केले होते. ही मंजुरी मिळण्यापूर्वीच शासनाच्या नगरविकास विभागाने त्याविषयी माहिती मागवून पुढील आदेश येईपर्यंत कार्यारंभ आदेश न देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित १६ कामांचा नऊ कोटी रुपयांचा निधी पालिकेच्या तिजोरीत पडून आहे, तर जिल्हा परिषदेच्याही शेकडो कोटीच्या कामांना यामुळे ब्रेक लागला आहे. जनसुविधा योजनेंतर्गत शासनाकडून ग्रामपंचायतींना रस्ते, पाणी, गटार, स्मशानभूमी, पथदीप आदी जनसुविधेची कामे करण्याठी कोट्यवधी रुपये आठ महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिले होते, यातील काही कामे सुरू झाली असून, जी कामे सुरू झालेली नाहीत व त्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेली नाहीत अशी कामे तत्काळ थांबवून त्याचा निधी शासनाने परत मागविल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जवळपास शंभर कोटींच्या आसपास निधी शासनाला परत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका