शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

फलकबाजांना अखेर दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:34 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. यासंदर्भात महापालिकेवर टीकेची झोड उठताच प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ७५ फलक हटविले आहेत. मात्र त्यासंदर्भात अवघ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या बकालतेत भर घालणारे अजूनही शेकडो फलक ‘जैसे थे’ असून, ते बहुतांशी सत्ताधारी तसेच इच्छुकांचे असल्यानेच प्रशासन हात लावण्यास धजावत नाहीत की काय? असा प्रश्न केला जात आहे.मुख्यमंत्री नाशिकला दत्तक घेतल्यानंतर शहरात स्वच्छता टापटीप राखण्याची नैतिक जबाबदारी या पक्षाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याला हरताळ फासण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) शहरात येणार असून, गुरुवारी (दि.१९) त्याचा समारोप होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांनी हीच संधी साधून जनादेश यात्रा आणि संपूर्ण मतदारसंघात फलक लावले आहेत. अधिकृत होर्डिंग्जशिवाय दुभाजक, रस्त्याच्या कडेला इतकेच नव्हे तर सिग्नल आणि वाहतूक बेटांनादेखील फलकांचा गराडा पडला आहे.राजकीय कार्यकर्त्यांनी हे फलक अशा जागेवर लावले आहेत की फलक लावल्यानंतर वाहतूक मार्ग न दिसता अपघात होऊ शकतात. परंतु त्याची तमा न बाळगता आजी-माजी आमदार तसेच अन्य इच्छुक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी फलक लावले आहेत. सोमवारी (दि.१६) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेदेखील शहराच्या दौºयावर असल्याने अनेक भागात आणि मुंबई नाका येथेदेखील वाहतूक बेटावर झेंडे आणि फलक लावण्यात आले होते.या प्रकारामुळे शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात मनपाच्या पूर्व परवानीशिवाय फलक लावू नये असे स्पष्ट निर्देश असतानादेखील आदेश डावलून फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेनेदेखील उच्च न्यायालयाचे आदेश डावलल्याचा आणि सरकार पक्षावर मेहेरबानी केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर महापालिकेने काही प्रमाणात फलक हटविण्यास सुरुवात केली. शहरात विविध भागांत ७५ फलक हटविण्यात आले असून, याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नियम डावलून फलकबाजीमहापालिकेत कोणत्याही फलकांच्या उभारणीसाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्याचा परवानगी क्रमांक फलकावर लिहावा लागतो. मात्र शहरात उभारलेल्या फलकांवर कोणत्याही प्रकारचे परवानगी क्रमांक लिहिलेले नाही त्यातच महापालिका अपघात घडेल अशा ठिकाणी म्हणजे दुभाजक, सिग्नल झाडावर किंवा वाहतूक बेटावर परवानगी देत नाही मात्र प्रत्यक्षात फलक अशाच ठिकाणी लावले असल्याने नियम डावलून फलक लावल्याचे उघड होत आहे.महापालिकेने दिवसभरात ३१ फलक हटविले. मुंबई नाका येथून काही फलक जप्त केल्यानंतर पुन्हा काही वेळातच त्याठिकाणी पुन्हा फलक लावण्यात आले. त्यामुळे फलकबाजांनी एक प्रकारे महापालिकेला आव्हान दिले आहे.आता मुख्यमंत्रीकाय करणार?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या सभेत फलकबाजांना सुनावले होते. फलक लावून उमेदवारी मिळत नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले होते.मात्र त्यानंतरदेखील नाशिकमध्ये फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या फलकबाजांच्या विरोधातकाय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBanerबाणेर