शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूरचा गाळ उपसा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:23 IST

सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसिन्नर : पाणी साठवण क्षमता वाढविण्याची कळकळ केवळ बोलण्यापुरतीच

 

 

सचिन सांगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून उगम पावणाºया म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण असून, सुमारे ३६५ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता आहे. भोजापूर धरणावर परिसरातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. हे धरण परिसरासाठी वरदान ठरलेले आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता तसेच टेकड्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चालली होती. धरणातील गाळ काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत ‘लोकमत’ने अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध केले होते.गेल्या वर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव करून मेरी संस्थेमार्फत धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्या अहवालात धरणात १३ लाख ६७ हजार ४२८ घनमीटर गाळ साचला आहे, म्हणजे १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा कमी झाला असे नमूद करण्यात आले होते. आमदार वाजे यांनी पुढाकार घेऊन धरणातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत तयारी केली होती. पाटबंधारे विभागाने सुमारे ४० लाख ८६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या तालुकास्तर बैठकीत आमदार वाजे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली. सदरचे काम युवा मित्र, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून केले जाणार होते. सदर कामाचा कार्यारंभ आदेशनिघाला होता. पहिल्या टप्प्यात धरणातून ३ लाख ६५ हजार ४७४ घनमीटर गाळाचा उपसा केला जाणार होता. भोजापूर धरणातील टेकड्या हटविल्यानंतर निश्चितच पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी लाभक्षेत्रातील नागरिक व शेतकºयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गतवर्षी तालुक्यातील कोनांबे व ठाणगाव धरणातील गाळ लोकसहभागातून काढला आहे. या भागातील शेतकरी व नागरिकांनीसुद्धा यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. धरणातील गाळ व टेकड्या काढल्यानंतर ३० ते ४० दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता वाढू शकते.- एस. एस. गोंदकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभागलोकसहभाग नसल्याने अडली कामेगेल्या वर्षी धरणातील गाळ काढण्यासाठी युवा मित्र संस्थेने दोन पोकलेन व डंपर ही यंत्रसामग्री धरण क्षेत्रावर आणून ठेवली होती. गाळ उपसल्यानंतर शेतकºयांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून न्यायचा होता; मात्र गाळ वाहून नेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आठ दिवसानंतर यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर गाळ उपशाचे काम अद्याप सुरू झाले नाही. लोकसहभाग नसल्याने धरणातील गाळ उपसा रखडला आहे. भोजापूर धरण तालुक्यातील सर्वात मोठे धरण असल्याने धरण गाळमुक्त करण्याचा आपला मानस आहे. पाण्याची पातळी वाढवून लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्याचा फायदा होईल. भोजापूर धरणातील गाळ व टेकड्या काढण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. पहिल्या टप्प्यातील कामास गेल्या वर्षी सुरुवात होणार होती. आठ दिवस धरण क्षेत्रात यंत्रसामग्री उभी होती; परंतु शेतकरी व लोकसहभाग नसल्याने काम होऊ शकले नाही. गाळ वाहून नेण्यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेतला पाहिजे.- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर