शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कांद्याच्या प्रश्नावर विरोधक दुतोंडी - भारती पवार

By श्याम बागुल | Published: August 22, 2023 4:12 PM

कांदा प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दुसऱ्या दिवशीही केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे.

नाशिक : सध्या उपलब्ध असलेला व भविष्यात लागणाऱ्या कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावेत यासाठी कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करीत आराेग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा व टोमॅटोच्या भाववाढीच्या प्रश्नावरून संसदेत सरकार विरोधी भूमिका घेणारा विरोधी पक्ष दुतोंडी असल्याची टीका केली आहे.

कांदा प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांनी दुसऱ्या दिवशीही केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२२) डॉ. भारती पवार यांनी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला आहे. निर्यात शुल्कात वाढ केली म्हणजे निर्यात बंदी केली असा नव्हे. या उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून केंद्र सरकाने नाफेड मार्फत दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, हा कांदा २४१० रूपये क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे.

निर्यात मुल्य कमी असतांना देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे यातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्यामुळे याचा विचार शेतकऱ्यांनी करावा असे सांगून डॉ. पवार यांनी, टोमॅटोचे दरवाढ, कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा राहूल गांधी संसदेत उपस्थित करून सभात्याग करतात. आता मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला विक्रमी भाव मिळणार असतांनाही पुन्हा आंदोलनाची भाषा करीत असून हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याची टीकाही केली आहे.

टॅग्स :Bharati pawarभारती पवार