शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

बंगालच्या चक्रीवादळाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, 8 ते 10 राज्यांना वातावरण बदलाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 6:07 PM

नाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा ...

नाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा भाग बेमोसमी पावसाने प्रभावित झालेला पाहावयास मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या महासागरात निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत गेली आणि अरबी समुद्रातही चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ लागल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत गेले. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सर्वसाधारणपणे चार दिवस स्थिर राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अजून पुढील दोन दिवस तरी नाशकात वातावरणावर या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पाहावयास मिळू शकतो. यामुळेच बेमोसमी पावसाला नाशिकसह कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सुरुवात झाली. बुधवारी मागील २४ तासांत शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील निफाड, लासलगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

किमान तापमानाचा पारा १३.९ अंशापर्यंत खाली घसरला असला तरीदेखील पुढील दोन दिवसांत यामध्ये अजून १ अंशाने घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे थंडीचा हंगाम अन् दुसरीकडे बेमोसमी पावसाचा तडाखा यामुळे वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. तसेच हवेत बाष्पाचे प्रमाणही वाढल्याने वातावरणात मागील दोन ते तीन दिवसांपासून धुके अधिक पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दृश्यमानतेची टक्केवारी काही प्रमाणात कमी झाल्याचे लक्षात येते. शुक्रवारीसुद्धा (दि.३) शहरात मळभ दाटलेले असेल आणि धुक्याच्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. मागील दोन दिवसांत वाऱ्याचा वेगदेखील सौम्य झाल्याने शहरासह जिल्ह्यात जोरदार बेमोसमी पाऊस अधिक झाला. शनिवारी सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन घडण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगदेखील वाढू शकतो. त्यामुळे बेमोसमी पावसाचा धोका कमी होण्यास मदत होईल. शेतकरीवर्गाने विशेषत: द्राक्ष बागायतदारांसह अन्य फळबागा उत्पादकांनी अधिक काळजी घेत शेतपिकांवर अधिकाधिक आच्छादन टाकून शेक देण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून लहरी निसर्गाच्या प्रभावामुळे शेतपिकांचे जास्तीत जास्त होणारे नुकसान टळण्यास मदत होईल.

पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये पाच दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा प्रभाव अरबी समुद्रातदेखील पाहावयास मिळत आहे. अरबी समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत गेल्याने मध्य, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.

- सुनील काळभोर, हवामान केंद्र प्रमुख, नाशिक

-

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक