शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

आॅटोमोबाइल क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:58 AM

मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यातील जीएसटी असो वा नोटबंदी असो त्याचा थोड्याफार प्रमाणात फटका उद्योगक्षेत्राला आणि व्यावसायिकांना बसला आहे.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

सातपूर : मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यातील जीएसटी असो वा नोटबंदी असो त्याचा थोड्याफार प्रमाणात फटका उद्योगक्षेत्राला आणि व्यावसायिकांना बसला आहे.आता मोदी सरकार पुन्हा स्पष्ट बहुमतात सत्तेवर आले आहे. त्यामुळे साहजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. भारतातील औद्योगिक उत्पादनाच्या ३४ टक्के वाटा असलेल्या आॅटोमोबाइल क्षेत्रासाठी सरकारने विशेष अर्थ योजना आणणे गरजेचे आहे. अशा अपेक्षा अखिल भारतीय आॅटोमोबाइल फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.विक्रेत्यांसाठीदेखील अर्थसंकल्पात धीर देणे गरजेचेवाहनांना लागणाºया सुट्या भागांच्या विक्रेत्यांसाठीदेखील अर्थसंकल्पात धीर देणे गरजेचे आहे. गॅरेज व्यावसायिकासह वाहन क्षेत्राशी संलग्न व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यावसायिकांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. दुचाकी वाहन हे सामान्य जनतेचे गरजेचे साधन आहे. यासाठी लागणारे सर्व सुटे भाग हे ५ टक्के जीएसटीमध्ये अंतर्भूत करावेत.- चंद्रकांत सानप, सचिवकौशल्य विकास योजना लागू करणे अपेक्षितउद्योगात वाहन उद्योगाची सर्वांत महत्त्वाची भूमिका ही या उद्योगात सक्रिय असलेले सुटे भाग विकणारे दुकानदार जे वाहन विकल्यानंतर विक्री पश्चात सेवा देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. यासोबत फार मोठ्या संख्येने संपूर्ण देशभरात कार्यरत असलेले वाहन दुरुस्ती करणारा कुशल कारागीर वर्ग जो असंघटित आहे आणि या कारागिरांसाठी कुठलीही सरकारी योजना नाही. या सर्वांना एकत्र आणून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य विकास योजना लागू करणे अपेक्षित आहे.- संजय सोनवणे, उपाध्यक्ष, अ. भा. आॅटोमोबाइल फेडरेशनइन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवून दिलासा द्यावावाहनांचे सुटे भाग (स्पेअर पार्ट) विकणारे दुकानदार जे वाहन विकल्यानंतर विक्री पश्चात सेवा देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. असंख्य सुटे भाग हे अजून ही २८ टक्के जीएसटीमध्ये अंतर्भूत आहेत. सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन ते १८ टक्केमध्ये आणावा. तसेच इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवून छोट्या दुकानदारांना दिलासा द्यावा. भारतातील औद्योगिक उत्पादनाच्या ३४ टक्के वाटा असलेल्या आॅटोमोबाइल क्षेत्रासाठी सरकारने विशेष अर्थ योजना आणणे गरजेचे आहे.- कैलाश चावला, स्थानिक अध्यक्ष

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक