शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

बागलाण, नांदगाव तालुक्यात विक्रेत्यांकडून कृत्रिम खतटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:11 IST

नामपूर : परिसरात व काटवन भागात युरिया खताची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना १ गोणी युरियासाठी दिवसभर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

नामपूर : परिसरात व काटवन भागात युरिया खताची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना १ गोणी युरियासाठी दिवसभर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.नामपूर परिसरात तसेच काटवण भागात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. काही भागातील शेतकºÞयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कोरोना संकटामुळे चार महिने रब्बी हंगाम टळल्याने शेतकºयाला संकटाचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे शेती माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आल्याने आर्थिक संकटाचा सामना सध्या शेतकरी करीत आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगाम आल्याने पेरणीसाठी खते, बियाणे, औषधे, मशागत आदीसाठी मुबलक खर्च आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्ज, उसनवार पैसे घेऊन पेरणी झाली पण पिकांना युरिया खाद्य मिळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.नामपूर येथे शेती बी -बियाणे, खते आदींचे मार्केट असून काटवन परिसरातील बहुतांश शेतकरी नामपुर शहरावर अवलंबून आहेत. सध्या शेतकऱ्यांनायुरियाच्या १ किंवा २ गोणी मिळत असल्याने शेतकºयांनी कृषी विभागाविरुद्ध नाराजी व्यक्तकेली आहे. स्थानिक विक्रेते कमी पुरवठा होत असल्याचे सांगत आहेत. कृषी विभागाशी संपर्क साधला असता. युरिया तयार करणाºया कंपन्यांकडून कोरोना संकटामुळे खत पुरवठा कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कृषी खात्याने येत्या तीन ते चार दिवसात युरिया खताचा साठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.\--------------------नांदगाव : सुरुवातीच्या दमदार पावसामुळे सध्या खरीप पिकांची स्थिती चांगली असून, ठिक-ठिकाणी कोळपणी झाल्याने पिकांना रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे असल्याच्या कालावधीतच तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई जाणवू लागल्याची तक्र ार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी अधिकाºयांकडे निवेदनद्वारे केली आहे. आत्मा योजनेत बांधावर बी-बियाणे व खते पुरविणारी शासकीय यंत्रणा तालुक्यात जोमाने कार्यरत असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खते मिळत नाहीत, याकडे स्वाभिमानी संघटनेने लक्ष वेधले आहे. लिंकिंग पद्धतीने रासायनिक खते वितरित करण्यात येत असल्याने मागेल त्याला खते मिळत नाहीत.रासायनिक खतांचा काळा बाजार थांबवा. मुख्य विक्रे त्यांच्या गुदामांची तपासणी करा तसेच बनावट खते जप्त करून योग्य कारवाई करावी, त्याच प्रमाणे दोषी विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे अशी स्वाभिमानीची मागणी आहे. निवेदनावर नीलेश चव्हाण, परशराम शिंदे, निवृत्ती खालकर, ज्ञानेश्वर निकम, समाधान व्हडगर, हेमंत चोळके, गणेश चव्हाण, दत्तात्रय महाजन, दत्तात्रय सरोदे, तेजुल बोरसे यांच्या सह्या आहेत.----------------

कोरोणाच्या संकटामुळे चार महिने खत खाद्य निर्माण करणाºया कंपन्या बंद असल्याने युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकºयांना मुबलक युरिया मिळावा यासाठी कृषी खात्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.- रुपेश सावंत, सभापती,वि. का. सोसायटी, नामपूर

टॅग्स :Nashikनाशिक