शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंचे साहित्य त्यातील अस्सलपणामुळेच चिरंजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST

नाशिक : ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यांचे लिखाण हे कल्पनेतील नव्हे तर वास्तवातील होते. त्याच अस्सलपणामुळे ...

नाशिक : ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यांचे लिखाण हे कल्पनेतील नव्हे तर वास्तवातील होते. त्याच अस्सलपणामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंजीव ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुरोगामी विचार मंच, दलित युवक आंदोलन व धम्मगिरी सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार वितरण व परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धम्मगिरी सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विशाल जाधव, दलित युवक आंदोलनाचे सचिन बागडे, पुरोगामी विचार मंचचे अशोक उफाडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. कसबे यांनी सांगितले की, ‘अण्णा भाऊ नेहमीच सामान्य माणसांसाठी लढले, ते महान शाहीर होते. लेखणीतून त्यांनी समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले. तुमचं जीवन या व्यवस्थेत बदलणार नाही, त्यामुळे ही व्यवस्था ताब्यात घ्यावी लागेल. ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले भीमराव’ यासाठी समाजातील तरुणांना पुढे यावे लागेल’, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी डॉ. कसबे यांच्या हस्ते सत्यशोधक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक कार्यासाठी भाऊसाहेब सोनवणे, कला व साहित्य क्षेत्रासाठी डॉ. मारोती कसाब, कामगार लढ्यासाठी कॉ. महादेव खुडे, महिला सक्षमीकरणासाठी प्रा. प्रमिला पवार, विद्यार्थी संशोधन विशाल लोमटे यांच्या वतीने त्यांच्या पालकांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ व दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सुरवसे यांनी केले.

फोटो ओळी ०७ -सत्यशोधक पुरस्कार

नाशिक : राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रा. प्रमिला पवार यांना देताना डॉ. रावसाहेब कसबे. समवेत डॉ. विशाल जाधव, सचिन बागडे, अशोक उफाडे आदी.