शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

शेतीची दुरवस्था, बेरोजगारीमुळे आरक्षणाची मागणी : हनुमंत गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:53 IST

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. जगभरात व्यवसाय उद्योगाच्या विविध संधी आहेत. त्यामुळे भारतासह जगभरातील विविध देशांमधील ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अथवा उद्योग व्यावसायाच्या संधी आहेत. त्या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांचा विकास करण्याची गरज असल्याचे गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

ठळक मुद्देजगभरात व्यवसाय उद्योगाच्या विविध संधी कौशल्यपूर्ण रोजगाराभिमूख शिक्षण देण्याची गरजबीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांचे प्रतिपादन

नाशिक : उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. जगभरात व्यवसाय उद्योगाच्या विविध संधी आहेत. त्यामुळे भारतासह जगभरातील विविध देशांमधील ज्या क्षेत्रात रोजगाराच्या अथवा उद्योग व्यावसायाच्या संधी आहेत. त्या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांचा विकास करण्याची गरज असल्याचे गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा विद्याप्रसारक समाजातर्फे रावसाहेब थोरात सभागृृहात रविवारी (दि.१९) समाज दिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस सुनील ढिकले आदी उपस्थित होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, शिक्षण संस्थेतून बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांनी स्वत:ला शोधतानाच आपल्यातील गुणवत्ता आणि कौशल्याच्या आधारे उद्योग व्यावसायिकता विकसित करता येईल, असे  शिक्षण मिळणे गरजेचे आहे. अशा शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणााºया अनेक संस्था समाजात कार्यरत आहे. भारतात सुमारे तीन हजार ५०० संस्था गुणवंत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देतात, तर देशाबाहेरील शिक्षणासाठी जवळपास ५०० संस्था शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत करतात. परंतु,अशा सस्थांपर्यंत विद्यार्थी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी) माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची आर्थिक दुरवस्था दूर करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच शेतकºयांनी हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन करण्यासोबतच उत्पादन वाढीसाठी पिकांना खते व पाणी कसे द्यावे, किती प्रमाणात द्यावे, यासारखी इत्यंभूत माहिती शेतकºयांना वेळच्या वेळी मिळावी, यासाठी बीव्हीजीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले. डॉ. सुनील ढिकले यांनी आभार मानले.

पशुसंवर्धन क्षेत्रातही संशोधन भारतात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या व्यवसायातही शेतकºयांना चांगला मोबदला मिळावा, म्हणून भाकड जनावरांवर बीव्हीजीने वैज्ञानिक प्रयोग करून लसी शोधून काढत त्यांना दुभते केले. दूध देणारी गाय किंवा म्हैस ५० ते ६० हजार रु पयांस मिळते. मात्र, दुभती जनावरे भाकड झाली की, ती कवडीमोल किमतीत शेतकºयाला विकावी लागतात. ही परिस्थिती येऊ नये, म्हणून बीव्हीजीने पशुसंवर्धन क्षेत्रातही संशोधन केल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीreservationआरक्षण