शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 19:38 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातील नाशिक जिल्ह्यातील ९० परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ४१७ महाविद्यालयातील ७९ हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८४.१६ टक्के म्हणजे ५९ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला आहे. येथे ४४ केंद्रांत २४ हजार १९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावमधून सर्वाधिक ८६.६१ टक्के निकाल लागला आहे. येथील ७१ परीक्षा केंद्रांवरून ४८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४२ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नंदुरबारच्या २३ केंद्रांवर १६ हजार २४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १३ हजार ६१४ म्हणजे ८३.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.निकालासह कॉपीमध्येही जळगाव प्रथम नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत जळगावचे सर्वाधिक ८६.६१ टक्के विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. मात्र परीक्षेदरम्यान सर्वाधिक १२६ कॉपी केसेस जळगावमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव उत्तीर्णतेच्या निकालासोबतच कॉपीप्रकरणामध्येही प्रथम असल्याचे दिसून आले आहे. बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात १३, धुळे १० तर नंदुरबारमध्ये केवळ ५ कॉपी प्रकरणे आढळली होती. त्या तुलनेत जळगावमधील गैरमार्गाची प्रकरणे नाशिक विभागीय मंडळाला आत्मचिंतन करायला लावणारी आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीSchoolशाळाHSC Exam Resultबारावी निकाल