शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 19:38 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातील नाशिक जिल्ह्यातील ९० परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ४१७ महाविद्यालयातील ७९ हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८४.१६ टक्के म्हणजे ५९ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला आहे. येथे ४४ केंद्रांत २४ हजार १९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावमधून सर्वाधिक ८६.६१ टक्के निकाल लागला आहे. येथील ७१ परीक्षा केंद्रांवरून ४८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४२ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नंदुरबारच्या २३ केंद्रांवर १६ हजार २४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १३ हजार ६१४ म्हणजे ८३.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.निकालासह कॉपीमध्येही जळगाव प्रथम नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत जळगावचे सर्वाधिक ८६.६१ टक्के विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. मात्र परीक्षेदरम्यान सर्वाधिक १२६ कॉपी केसेस जळगावमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव उत्तीर्णतेच्या निकालासोबतच कॉपीप्रकरणामध्येही प्रथम असल्याचे दिसून आले आहे. बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात १३, धुळे १० तर नंदुरबारमध्ये केवळ ५ कॉपी प्रकरणे आढळली होती. त्या तुलनेत जळगावमधील गैरमार्गाची प्रकरणे नाशिक विभागीय मंडळाला आत्मचिंतन करायला लावणारी आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीSchoolशाळाHSC Exam Resultबारावी निकाल