शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांसाठी १८१ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:17 IST

जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

ठळक मुद्देजमीन महसुलात सूट : दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राची अट

नाशिक : जिल्ह्णात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य स्तरावर ६३६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केलेली असताना राज्य शासनाकडून मंगळवारी केवळ १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचेच अनुदान नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.
विशेष म्हणजे हे अनुदान दोन हेक्टरच्या आतील व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांनाच देण्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याने ३३ टक्क्यांपेक्षा कमी आणि दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांना याचा फायदा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्णातील ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्ये, कांदा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
यात वार्षिक फळपिकांखालील ४१८ हेक्टर क्षेत्र बाधीत असून, त्यासाठी ५६ लाख रुपयांची मदत अपेक्षित होती, तर जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार, बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ हजार रुपयांचा मदत निधी अपेक्षित असताना शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने केवळ १८१ कोटींचीच मदत दिल्याने आता उर्वरित क्षेत्रासाठी मदत मिळणार किंवा नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
थेट बॅँक खात्यात जमा होणार रक्कम
शासनाच्या महसूल व वन विभागाने आपदग्रस्तानांना मदतीबाबतचे परिपत्रक काढले असून, यात नाशिक जिल्ह्णासाठी १८१ कोटी ५० लाख ८४ हजार इतकीच मदत देण्यात आली आहे. यात शेतीपिकांसाठी ८ हजार प्रति हेक्टरी, तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी वाटप केले जाणार आहेत. दोन हेक्टरच्या आत आणि ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांनाच ही मदत मिळणार असून, संबंधित बाधीतांच्या बँक बचत खात्यात जमा केली जाणार आहे. या मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये अशा स्पष्ट सूचना परिपत्रकातून करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बाधीत गावांना या जमीन महसुलात सूट देण्यासोबतच शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याच्या सूचनाही या पत्रकातून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी