शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
3
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
6
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
7
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
8
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
9
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
10
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
11
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
12
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
13
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
14
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
15
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
16
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
17
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
18
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
19
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
20
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हमसे का भूल हूई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:32 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले ...


मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विषय समिती बदलाचा निर्णय एकतर्फी घेता, किमान मला विश्वासात तर घेतले असते, सदस्यांची बैठक कधी झाली, एकमताने कधी ठरविले गेले याबाबतचा खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त करीत सभापती अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना लेखी पत्र दिले. त्यामुळे विषय समिती बदलाबाबतची चर्चा रंगली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या बदलाचा निर्णय शुक्रवारच्या सर्वसाधारणत बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेची सुरुवातीपासूनच अर्थ व बांधकाम समिती मिळावी यासाठीची मागणी होती. परंतु सत्ता स्थापनेच्या वेळी ऐनवेळी घडामोडी होऊन काँग्रेस-सेनेची युती झालेली असतांना त्यात भाजपचे नेते दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री दिपक पाटील यांनी एण्ट्री करीत सभापतीपद मिळविले. शिवाय शिवसेनेला दुय्यम दर्जाचे कृषी व पशुसंवर्धन या समित्या देण्यात आल्या. आणखी एक सभापतीपद किंवा बांधकाम व अर्थ समिती या दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नाराज होते. गेल्या पाच महिन्यात ही नाराजी लपून राहिली नाही.
गेल्या वेळच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे काही सदस्य व शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहून तांत्रिकदृष्टया अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अध्यक्षांना अर्ध्यातून सभा सोडावी लागून ती स्थगित करण्यात आली होती. त्याचवेळी यापुढे आणखी घडामोडी घडतील हे स्पष्ट झाले होते. अखेर राजकीय घडामोडी घडून शिवसेनेकडे बांधकाम समिती देण्याचा निर्णय झाला. घडामोडी होतांना काँग्रेस, शिवसेना यांनी भाजपलाही विश्वासात घेतल्याचे आजच्या चित्रावरून स्पष्ट होते. उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सभेपूर्वी दुपारी दिलेल्या स्रेहभोजनाला भाजपचेही सदस्य उपस्थित राहिले. शिवाय विषय समिती बदलाचा विषय निघाला त्यावेळी देखील काँग्रेस, शिवसेना, भाजप व राष्टÑवादीचे सदस्य देखील शांत होते. त्यामुळे हा विषय एकमताने मंजुर झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे याचवेळी सभापती पाटील यांनी आपले म्हणने रेकॉर्डवर घेण्याची सुचना केली. शिवाय अध्यक्षांना लेखी पत्रही दिले. त्याची उत्तरे मिळावी अशी मागणी केली.
अभिजीत पाटील यांची राजकीय पार्श्वभुमी वडिल शहाद्यात भाजपचे नगराध्यक्ष आहेत. तर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्याचे वलय पहाता त्यांना सभापतीपदही मिळाले आहे. परंतु विषय समिती बदलाच्या वेळी त्यांना विश्वासात न घेतले गेल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे आजचा निर्णय एकमताने झाला असल्याचे बोलले जात असले तरी अभिजीत पाटील यांची खदखद कायम आहे. जिल्हा परिषदेत सर्वच पक्ष सत्ताधारी आहेत. काँग्रेसला अध्यक्ष व दोन सभापती, शिवसेनेला उपाध्यक्षपद तर भाजपला एक सभापतीपद दिले गेले आहे. राष्टÑवादीचे तीन सदस्य भाजपाच्या गटात आहेत. त्यामुळे येथे विरोधीपक्षच कुणी नसल्याची स्थिती आहे.