शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड द्यावे लागत असून, रस्त्याअभावी गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे.
या गावकऱ्यांना रस्ता नसल्याने घर बांधकामासाठी लागणारे साहित्य सिमेंट, रेती, खडी तसेच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणेसह इतर साहित्य नेण्या-आणण्यासाठी गाढवाचा आधार घ्यावा लागतो व वेळेवर गाढव मिळाले नसल्यास खडकाळ घाटमार्गाने पायपीट करून नऊ ते पंधरा किलोमीटर डोक्यावरच जीवनावश्यक वस्तूंचे ओझे घेत अंतर मोजावे लागत आहे.
आजारी रूग्णांना रूग्णालयात औषधोपचारासाठी किंवा गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी रूग्णालयात नेण्यासाठी लाकडी दाड्यांना झोळी बांधून त्यात रूग्ण अथवा गर्भवती महिलांना झोपवून ती झोळी घरातील दोन ते चार सदस्य खांद्यावर उचलून पायवाटेने त्यांना रापापूरपर्यंत आणतात. तेथून पुढे तळोदा रूग्णालय गाठावे लागते
तळोदा येथून रापापूरपर्यंत रस्ता असून, रापापूरपासून पुढे नऊ ते दहा किलोमीटर पाल्हाबार, पाल्हाबार ते कुवलीडाबर हे अडीच ते तीन किलो मीटर, कुवलीडाबर ते चिडमाळ तीन किलो मीटर असा घाट वळणचा खडकाळ भाग रस्ता नसल्याने पायवाटेच्या मार्गाने घर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, खडी, रेती, शेतकºयांचे बी-बियाणे, खते यासह जीवनावश्यक वस्तूंचे ओझे रापापूरहुन गाढवावर आणावे लागते व वेळेवर गाढव उपलब्ध झाले नाहीतर स्वत:च हे जीवनावश्यक ओझे डोक्यावर घेऊन घराचे अंतर कापावे लागते.
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मंजूर निधी हा घर बांधकाम साहित्य घरापर्यंत आण्यातच खर्च होत असून, घराचे बांधकामही पूर्ण होत नाही. पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे रस्ता नसल्याने वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे या गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे. रस्ताअभावी वाहन जाऊ शकत नसल्याने पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे हातपंपदेखील टाकता आले नाही. हातपंपाअभावी पाण्याची सोय होऊ शकली नसल्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करीत नदीच्या किनाºयावर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. पावसाळ्यात जर नद्यांना पाणी आले की मग नद्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहत बसावे लागते. गुरांनादेखील याच ठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

रस्ता नसल्याने दळण वळणाचे साधन उपलब्ध होवू शकत नाही. रस्त्याअभावी हातपंप, बोरवेल टाकू शकत नाही. आजारी व्यक्ती व गरोदर मातांना तत्काळ दावाखान्यात दाखल करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना गरीब लोकांनासाठी असून, घरकुलासाठी देण्यात येणारा पैसा हा वाहतुकीतच खर्च होत असल्याने या दुर्गम भागातील लोक कसे घर पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या भागात रस्त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या दुर्गम भागातील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी होत आहे.
- गणेश पाडवी, पाल्हाबार