शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा अनोखा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या उत्थानासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात असून, अशाच उपक्रमातून ...

नंदुरबार : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या उत्थानासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात असून, अशाच उपक्रमातून सुरू झालेला ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा प्रयोग यशस्वी झाला असून त्यातून १०० शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. या प्रयोगांतर्गत पाच गुंठे जागेत एक आगळ्या पद्धतीने सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे.

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती ही शेतीसाठी प्रतिकूल आहे. डोंगर-उताराची जमीन त्यातच सिंचनाचा अभावामुळे या भागातील आदिवासींकडे पारंपरिक शेती असली तरी त्यांच्यासाठी समृद्धीचा मार्ग फार लांब राहिला आहे. या आदिवासींना मुख्य प्रवाहाशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तेथील शेती समृद्ध करून आदिवासी उत्थानासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. विशेषत: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशनअंतर्गत ग्रामसमृद्धी प्रकल्पातून बायफ संस्थेच्या संयोजनाने राबविण्यात येणारा ‘ट्रेलिस बेस व्हेजिटेबल्स ॲण्ड टँक नी ड्रीप सिस्टिम’ अंतर्गत १०० शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याअंतर्गत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात १६ गावांची निवड करून तेथील १०० शेतकरी निवडण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांकडे असलेल्या पाच गुंठे जागेत वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी मंडप तयार करण्यात आला आहे. तेथे ‘सातपुडा पॅटर्न’ची अनोखी सिंचन व्यवस्था पहायला मिळते. त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर एक हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. या टाकीतून ड्रीप करण्यात आले आहे. साध्या नळ्या लावून आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून ही ड्रीप करण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीत संबंधित शेतकरी जवळपासच्या ठिकाणाहून पाणी आणून ती भरतात. बहुतांश शेतकरी गाढवावरून पाणी वाहून टाकीत भरतात. या पाण्याच्या टाकीतून ड्रीपद्वारे लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याला ते पाणी देतात.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी गिलकी, कारले आणि दुधीभोपळ्याची लागवड केली आहे. ही योजना बायफच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी राबवीत आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला साधारणत: ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मंडपात संबंधित शेतकरी १० वर्षांपर्यंत भाजीपाल्याचे पीक घेऊ शकणार आहेत.

निवड झालेली गावे

या प्रकल्पाअंतर्गत धडगाव तालुक्यातील काकर्दा, चोंदवाडे, धमाके, हरणखुरी, शेलकुई, खरवड, उमराणी, बिहरी तर अक्कलकुवा तालुक्यातील काठी, भगदरी, बेडाकुंड, जमाना, वेली, बिजरीगव्हाण, बर्डी, भांग्रापाणी या गावांची निवड करण्यात आली असून या गावांमधील १०० शेतकरी ही योजना राबवीत आहेत.

ही योजना चांगली असून त्यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. जानेवारी महिन्यात आम्ही भाजीपाल्याची लागवड केली होती. आता त्याचे उत्पन्न सुरू झाले असून लॉकडाऊनमुळे याच भागात रस्त्यावर बसून भाजीपाला विकला जात आहे. आपल्याला सुमारे २५ हजारांचे उत्पन्न मिळाले. पुन्हा ऑगस्टमध्ये लागवड करणार आहोत.

-तिरसिंग इजमल पावरा, चोंदवाडे, ता.धडगाव