शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

साडेसात हजार अवकाळी बाधितांना दोन कोटीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची भरपाई म्हणून शासनाने आकस्मिता निधीतून साडेचार हजार कोटी रुपयांना मंजूरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची भरपाई म्हणून शासनाने आकस्मिता निधीतून साडेचार हजार कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे़ यात नंदुरबार जिल्ह्याच्या वाट्याला २ कोटी ४८ लाख रुपये येणार असून यातून साडेसात हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़यापूर्वी जिल्हा प्रशासलाने तीन हजार शेतकऱ्यांना १ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले होते़ अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात ७८, नवापुर १ हजार ५९३, शहादा २ हजार ६८, तळोदा ८, अक्कलकुव ३ हजार ९६५ तर धडगाव तालुक्यात ३ हजार १७३ अशा एकूण १० हजार ८८५ शेतकºयांचे नुकसान झाले होते़ यासाठी तीन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने घोषित केले होते़ पहिल्या टप्प्यात १ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात आले होते़ दुसºया टप्प्यात ७ हजार ७३३ शेतकºयांना २ कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित होते़ गेल्या १२ दिवसांपासून या रकमेची प्रतिक्षा करण्यात येत होती़ शुक्रवारी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये मंजूर केले असले तरी सायंकाळपर्यंत प्रशासनात रक्कम आल्याचा संदेश प्राप्त झालेला नव्हता़ सोमवारी या संबधी कारवाई झाल्यास तात्त्काळ वाटपाला सुरुवात होणार आहे़ तालुकास्तरावर बाधित शेतकºयांच्या याद्या बँक खात्यांच्या माहितीसह तयार असल्याने तातडीने खात्यावर देण्याची कारवाई होणार आहे़

नव्याने मिळणाऱ्या निधीतून नवापुर तालुक्यातील ४३, शहादा १ हजार ५५९, अक्कलकुवा ३ हजार २५४ तर धडगाव तालुक्यातील २९०० शेतकरी असे एकूण ७ हजार ७३३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे़ विभागीय आयुक्तांकडून निधी प्रशासनाकडे आल्यानंतर तालुकास्तरावर दिला जाईल़ नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील एकाही लाभार्थीला नव्याने मिळालेल्या निधीतून रक्कम मिळणार नसल्याची माहिती आहे़