शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन पाड्यांवर टँकर, तर ९२ टंचाईग्रस्तांवर गावामध्ये उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळी स्थिर असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले आहे. यातून जिल्ह्यात यंदा ...

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळी स्थिर असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले आहे. यातून जिल्ह्यात यंदा केवळ ९२ गावे आणि १८८ पाडे टंचाईग्रस्त असून, या गाव-पाड्यांसाठी टंचाई निवारण आराखड्यांतर्गत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गाव आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी यंदा दीड मीटरपेक्षा अधिक असली तरीही सातपुड्याच्या दुर्गम भागात धडगाव तालुक्यातील कुंडलचा गुगलमालपाडा आणि गाैऱ्याचा बोदलापाडा या दोन पाड्यांना यंदाही टँकर सुरू करण्यात आले आहेत. या पाड्यांवर १० वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टंचाई निवारण आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात २८८ विंधनविहिरींचे खोदकाम करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ग्रामपंचायतींकडून देण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार हे २८८ हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये यंदा पर्यायी व्यवस्था म्हणून ३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव देण्यात आले होते. यातील १० पेक्षा अधिक प्रस्ताव हे नंदुरबार तर उर्वरित प्रस्ताव हे शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील असून, त्यावर कामकाज सुरू करण्यात आले आहे. सोबत ४८ पाणी योजनांच्या प्रस्तावांवर कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.