नंदुरबार,दि.11 - जिल्हा निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी होऊनही शासकीय कार्यालय आणि ग्रामीण भागात अनेक पदे आजही निम्म्यापेक्षा रिक्त आहेत़ शासनाकडून पदांची भरती होऊनही नंदुरबार जिल्ह्यात मात्र पदांची पूर्तता होत नसल्याने शहरी आणि ग्रामीणस्तरावर नागरिकांना ‘सजा’ सहन करावी लागत आह़े
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा विस्तार आणि सिमावर्ती भाग यामुळे तलाठी पदांची भरती करण्याची अपेक्षा होती़ गेल्या दोन वर्षात पदभरती होऊनही तलाठींवर कामाचा बोजा कायम आह़े वसूली, दाखले वाटप आणि ऑनलाईन यात गुरफटलेल्या एकेका तलाठीवर 10 गावांची जबाबदारी आह़े त्यातही पाच वर्षात एकाही तलाठीची पदोन्नती न झाल्याने मंडळाधिका:यांच्या जागाही रिक्त आहेत़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पदभरतीबाबत कारवाई केल्यास तलाठींवरचा बोजा कमी होऊन नागरिकांची कामे होणार आहेत़
डिजीटल साताबारा प्रणालीत नंदुरबार जिल्हा अव्वल आला आह़े जिल्ह्यातील सातरबारे संगणकीकृत झाल्याने शेतक:यांची एक समस्या निकाली निघाली आह़े मात्र या सातबा:यांच्या प्रिंट काढणे आणि त्यांच्यावर सही शिक्के देणा:या तलाठींकडे संगणक आणि प्रिंटर ठेवण्याची जागाच नसल्याने अडचणी येत आहेत़
नंदुरबार तालुक्यात 137, शहादा 150, तळोदा 67, नवापूर 114, अक्कलकुवा 66 आणि धडगाव तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात तलाठी केवळ वसुली आणि शेतसारा वसुलीसाठी येताना दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े शेती खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मूहूर्त काढण्यापूर्वी तलाठींची तारीख घ्यावी लागत असल्याचे किस्से ग्रामीण भागात सर्वश्रृत होत आहेत़ जिल्ह्यातील तब्बल 586 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात 200 पेक्षाही कमी तलाठी नियुक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आह़े यातच ऑनलाईन आणि पेपरलेस वर्कचा गाजावाजा होत असला तरी, नोंदणी आणि दाखल्यांसाठी तलाठींकडेच नागरिकांना जावे लागत आह़े
नंदुरबार तालुक्यात 154, शहादा 185, तळोदा 94, नवापूर 163, अक्कलकुवा 193 आणि धडगाव तालुक्यातील 163 अशा एकूण 952 गावांसाठी सध्या जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात 209 तलाठींची नियुक्ती करण्यात आली आह़े या तलाठींकडून आठवडय़ातील चार दिवस ग्रामीण भागात आणि तीन दिवस त्या-त्या तालुका मुख्यालयात कामकाज करण्यात येत आह़े ‘आधीच कमी त्यात काम न होण्याची हमी’ अशी स्थिती सध्या ग्रामीण भागात आह़े
महसूल विभागात तलाठींची सरळसेवेतून 234 पदे मंजूर आहेत़ यापैकी 209 पदे भरण्यात आली असून 25 पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांचे कामकाजही 209 तलाठींनाच करावे लागत असल्याने समस्या वाढत आहेत़