शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोराईकडे जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या मुख्य रस्त्यापासून ते खापार ग्रामपंचायत हद्दीपर्यंतच्या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता अक्कलकुवा तालुक्यातील ...

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या मुख्य रस्त्यापासून ते खापार ग्रामपंचायत हद्दीपर्यंतच्या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता अक्कलकुवा तालुक्यातील कोराई ग्रामपंचायत अंतर्गत येत असून, अनेक वर्ष उलटूनही या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या पावसाळा असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच वस्तीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. याच रस्त्यावर ग्रामपंचायत इमारत असून, ग्रामपंचायत पदाधिकारीही याच मार्गाने ग्रामपंचायतीमध्ये येतात. कोराई येथील महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, तालुक्यात आर्थिकदृष्ट्या ही ग्रामपंचायत चांगली असूनही, रस्ता दुरुस्ती करण्याबाबत मार्ग निघत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

दरवर्षी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारकडून मोठा निधी येतो. शिवाय घरपट्टीमधूनही मोठा महसूल ग्रामपंचायतीला मिळत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. ग्रामपंचायतीशेजारीच अंगणवाडी असून, याठिकाणी वाहनांची वर्दळही असते. एकंदरीतच या रस्त्यावर मोठी वर्दळ असून, वरिष्ठांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांनी केली आहे.

कोराई व खापर या दोन्ही गावांतील ग्रामीण रुग्णालय, शाळा, महाविद्यालय बँक आदी सुविधा आहेत. तसेच परिसरातील नागरिक याठिकाणी बाजारहाटसाठी येत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

-सलमान पठाण, ग्रामस्थ, कोराई