शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी अतिशय उत्साहात व शांततेत मतदान झाले. त्यासाठी अनेक केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. ...

नंदुरबार : जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी अतिशय उत्साहात व शांततेत मतदान झाले. त्यासाठी अनेक केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मशीन बदलून येईपर्यंत मतदानाला व्यत्यय आला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.४९ टक्के मतदान झाले होते.

जिल्ह्यात शुक्रवारी ६३ ग्रामपंचायतींसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी मतदानाला गर्दी दिसून आली. सकाळी पहिल्या दोन तासात साडेनऊ वाजेपर्यंत १२.६९ टक्के मतदान झाले होते. या काळात एकूण १४ हजार ११३ मतदारांनी मतदान केले. त्यात सहा हजार १४९ महिला तर सात हजार ९६४ पुरुष मतदार होते. साडेअकरा वाजेपर्यंत ३१.६९ टक्के मतदान झाले. या काळात मात्र मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. या काळात झालेल्या ३५ हजार २४९ मतदानापैकी १८ हजार २३६ महिला मतदारांनी मतदान केले होते. तर १७ हजार १३ पुरूष मतदार होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ४६.८३ टक्के मतदान झाले. या काळातही मतदानासाठी महिला मतदारांची आघाडी राहिली.

दुपारी साडेतीन पर्यंत ६६.४९ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजेपर्यंत झालेल्या एकूण ७३ हजार ९६४ मतदानापैकी ३७ हजार ४९२ महिला मतदारांनी तर ३६ हजार ४७२ पुरूष मतदारांनी मतदान केले होते.

तालुकानिहाय चित्र पाहिल्यास दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नवापूर तालुक्यात सर्वाधिक ८०.६७ टक्के मतदान झाले. तर अक्कलकुवा तालुक्यात ७७.८५, अक्राणी तालुक्यात ५१.९७, शहादा तालुक्यात ६५.७७, तळोदा तालुक्यात ७५.४४ आणि नंदुरबार तालुक्यात ६९.१६ टक्के मतदान झाले होते.

शेवटच्या दोन तासात प्रत्येक ठिकाणी उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न केले.

बंधारपाड्यात मशीन बंद

नवापूर तालुक्यातील बंधारपाडा ग्रामपंचायत अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक दोनवर दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे साधारणत: ४० मिनिट मतदान थांबले होते. नवापूरहून ईव्हीएम मशीन बदलून आल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. या केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९० टक्के मतदान झाले.