शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माणूस म्हणून जगायला शिकण्याची गरज-ॲड. के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST

कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, ...

कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, नवापूर पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी, अजित नाईक, रूपसिंग पाडवी, कुंदाबाई नाईक, दिलीप नाईक, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड. पाडवी यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक-युवतींनी समाजासमोर आदर्श प्रस्तुत केला आहे. शासनाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. राज्यघटनेला सर्वोच्च स्थानी मानून समाजात समानता आणि एकता स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. भारतीय संस्कृतीत माणुसकीच्या तत्त्वाला सर्वाधिक महत्त्व आहे. आंतरजातीय विवाहात माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करण्याची भावना असल्याने अशा दाम्पत्यांचे सहजीवन इतरांना प्रेरणा देणारे आणि समाजात जातीय सलोखा निर्माण करणारे ठरेल, असे त्यांनी सांगितले.

आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबीयांचे सामंजस्याने मतपरिवर्तन करणे किंवा घरातून विरोध असतानाही लग्नानंतर आई-वडिलांचा सन्मान करून त्यांच्याकडे लक्ष देणे या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाहामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होईल. देशात एकात्मता स्थापन करण्यासाठी अशा विवाहांना प्रोत्साहन देणारी ही चांगली योजना आहे. माणूस म्हणून जोडीदाराला स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी मुलगा किंवा मुलगी असा भेद न मानता एक किंवा दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी. मुलासारखेच मुलीलाही चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाज सुदृढ होईल आणि जातिभेद नष्ट होण्यास मदत होईल. प्रास्ताविकात श्री. नांदगावकर यांनी योजनेविषयी माहिती दिली. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या तीन दाम्पत्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते ३० जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.