शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

लेखी परीक्षेनंतर अंतर्गत गुणांकन; शाळेतच होणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत ...

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षांसाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो आहे. त्याच शाळेत त्याची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वर्गखोल्यांची कमतरता जाणवेल त्यांची व्यवस्था लगतच्या परीक्षा उपकेंद्रात करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेच्या वेळी कोरोनाची लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये आढळल्यास त्यांची जून महिन्यात ठराविक ठिकाणी विशेष परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. यासाठी तालुकास्तरावर मोजकी परीक्षा केंद्र असतील. याबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर होणार आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने बोर्डाने लेखी परीक्षेचा कालावधीत वाढ केली आहे. ८० गुणांच्या पेपरसाठी तीन तासाऐवजी साडेतीन तासांचा वेळ असेल. ४० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढविली आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक पेपरसाठी २० मिनिटे वेळ अधिक असेल.

परीक्षेच्या तारखात बदल

१२ ते २८ एप्रिल दरम्यान १० वी तर ५ ते २२ एप्रिल या कालावधीत १२ वीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, यावर्षी १० वीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाहीत तर लेखी परीक्षेनंतर १० वीच्या विद्यार्थ्यांना २१ मे ते १० जून या कालावधीत लेखन कार्य सादर करावे लागणार आहेत.

१२ वीच्या विद्यार्थ्यांची २२ मे, १० जून या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होईल. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यंदा कमी झाल्याने पाच ते सहा प्रात्यक्षिकांवर परीक्षा घेतली जाईल. याबाबत लवकरच माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्डाकडून दिली जाणार आहे.